Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Eid-e-Milad 2021: ईद ए मिलाद साजरा करण्यासाठी राज्य सरकारने नियमावली जाहीर केली

Webdunia
सोमवार, 18 ऑक्टोबर 2021 (14:17 IST)
ईद ए मिलाद हा सण मुस्लिम बांधवांचा आहे. इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती सोहळा मुस्लिम बांधव उत्साहाने साजरा करतात.या दिवशी धार्मिक प्रवचन होतात आणि मिरवणूक काढली जाते.यंदा कोरोनाचे प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे आणि कोरोनावरील निर्बंध शिथिल केल्यामुळे हे सण साजरे केले जात आहे. त्या साठी राज्य सरकारने काही नियमावली जाहीर केली आहे. यंदाच्या वर्षी 19 आणि 20 ऑक्टोबर रोजी ईद ए मिलाद साजरी केली जाणार आहे. त्यासाठी राज्याच्या गृह विभागाने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहे. त्यांचे पालन करूनच हा सण साजरा केला जावा असे सांगण्यात आले आहे. या मध्ये मिरवणूक काढण्यासाठी पाच ट्रकांना परवानगी देण्यात आली आहे. त्यात असलेल्या लोकांव्यातिरिक्त अतिरिक्त 5 लोकांना पोलिसांची परवानगी घेऊनच शामिल करता येईल.गेल्या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सण साजरे होऊ शकले नाही.यंदाच्या वर्षी कोरोनाचे प्रकरण कमी झाल्यांमुळे सर्व सण साजरे केले जात आहे. त्यासाठी काही नियमावली राज्य सरकारने जारी केली आहे. त्यांचे पालन करूनच सण साजरे केले जावे असे सांगण्यात आले आहे.  
* मिरवणूक काढण्यासाठी पाच ट्रकांना परवानगी देण्यात आली आहे
* सामाजिक अंतर राखणे बंधन कारक आहे.
* सेनेटाईझरआणि मास्क वापरणे बंधनकारक आहे. 
* मिरवणुकाच्या स्वागतासाठी पोलिसांच्या परवानगीने पंडाल उभारले जाऊ शकतात.
* साबिलीजवळ 5 लोकांना उभे राहण्याची परवानगी.
* मिरवणुकीत पाण्याच्या सीलबंद बाटल्या वितरण करणे बंधन कारक 
* लोकांनी मिरवणूक पाहण्यासाठी गर्दी करू नये. 
* मिरवणुकीत लोकांची संख्या पोलीस ठरवतील.
 या नियमावलीचे पालन करून सण साजरे करावे असे सांगण्यात आले आहे.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments