Publish Date: Fri, 20 Dec 2024 (08:53 IST)
Updated Date: Fri, 20 Dec 2024 (10:58 IST)
Nagpur News: राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला विधानपरिषदेत उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, राज्याला प्रत्येक क्षेत्रात नंबर वन करण्यासाठी सरकार संघभावनेने काम करत आहे. तसेच लक्ष्य एकच आहे ते म्हणजे मिशन समृद्ध महाराष्ट्र. यावेळी त्यांनी विरोधी पक्ष आणि तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या कार्यपद्धतीवरही जोरदार हल्लाबोल केला.
मिळालेल्या माहितीनुसार गेल्या अडीच वर्षात महायुतीने विक्रमी काम केले, त्यामुळेच निवडणुकीत ऐतिहासिक विजय झाल्याचे ते म्हणाले. आता जनतेच्या विश्वासामुळे आमची जबाबदारी आणखी वाढली आहे. विरोधकांनी अनेक आरोप केले पण जनतेने त्यांच्यावर पूर्ण बहिष्कार टाकला. तसेच विरोधकांच्या ईव्हीएमच्या मुद्द्यावर एकनाथ शिंदे म्हणाले की, सिंहासन वारसाहक्काने मिळते पण बुद्धीचा वारसा मिळत नाही, असा टोला त्यांनी लगावला.