Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

किल्ले विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यास सुरुवात; वन विभागाची मोठी कारवाई

Webdunia
शुक्रवार, 9 डिसेंबर 2022 (07:58 IST)
संभाजी राजे छत्रपती  यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी झलेल्या बैठकीनंतर जिल्हा प्रशासनाला जाग आली असून प्रशासनाकडून किल्ले विशाळगडावरील अतिक्रमण काढण्याला सुरुवात केली आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी विशाळगडावरील अतीक्रमण काढण्यासाठी काल 7 तारखेला जिल्हा अधिकाऱ्यांची भेट घेऊन विशाळगडावरिल परिस्थिती मांडली होती. त्याला प्रतिसाद म्हणून आज व न विभागाकडून आज मोठी कारवाई करण्यात आली. गडाच्या पायथ्याला असणारे शेड्स वन विभागाकडून उध्वस्त करण्यात आले असून संपूर्ण कारवाईनंतरच आंदोलन मागे घतले जाईल अशी शिवप्रेमींनी भूमिका घतली आहे.
वनविभागाचे पथक गुरूवार 8 डिसेंबर रोजी सकाळीच गडावर दाखल झाले. वनविभागाच्या हद्दीतील बुरजाजवळील दस्तगिर इस्माईल मुजावर यांचे तर पायथ्याचे पांडूरंग धोंडू धुमक यांचे थंड पेयाचे दुकान जमिनदोस्त केले. पक्क्या बांधकामाचे नुकसान होवू नये म्हणून पायथ्याच्या एक एकरातील वीस जणांनी आपली अतिक्रमणे पंधरा दिवसात काढून घ्यावीत. असा अल्टीमेटम जिल्हा उपवनसंरक्षक जी.गुरूप्रसाद यांनी अतिक्रमणधारकांची बैठक घेऊन दिला. तातडीने झालेल्या या कारवाईमुळे गडावर अतिक्रमणधारकाचे धाबे दणाणले आहेत.
विशाळगडावर चाँद इमारत व पुढील बुरूज परीसरात गट नं१०८२(४९ब) परीसरात ऐंशी एकर जमिन आहे. तर पायथ्याशी १०८१ गटातील एक एकरात पार्कींग, हाँटेल, कोल्ड्रिंक्सची दुकाने थाटली आहेत.प्रत्यक्षात वीस मांडव दिसतात पण एकावन्न लोकांनी पायथ्याला जागा आरक्षित केल्याची माहिती माजी सरपंच संजय पाटील यांनी दिली.ग्रामपंचायतीने ही परवानगी कशी दिली यांचे आश्चर्य व्यक्त केले.
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कथा बायजाबाईंची

Death Line on Hand: हाताच्या रेषांवरून मृत्यू कधी आणि कसा होईल हे जाणून घ्या, हस्तरेषाशास्त्र काय म्हणते ते जाणून घ्या

ऊँ म्हणा आणि ही वस्तू तुमच्या पर्समध्ये ठेवा, तुमचे घर पैशांनी भरून जाईल

लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिपला मजेदार बनवण्यासाठी हे 5 टिप्स अवलंबवा

सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने खाल्ल्याने होतात हे 5 आश्चर्यकारक आरोग्य फायदे

सर्व पहा

नवीन

LIVE: कुस्तीगीर पृथ्वीराज मोहोळ महाराष्ट्र केसरी बनले

लाडकी बहीण योजनेमुळे राज्याची अर्थव्यवस्था डगमगली, अनेक योजना थांबल्या

मुंबईतील वांद्रे टर्मिनस येथे रेल्वेत महिलेसोबत दुष्कर्म

मोदी सरकारचा प्रत्येक अर्थसंकल्प म्हणजे निवडणूक पॅकेज… संजय राऊत यांनी टोला लगावला

मुंबई विमानतळावर अपघातात परदेशी प्रवाशासह 5 जण जखमी

पुढील लेख
Show comments