Festival Posters

अजित पवार गटाने सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये त्रुटी! शरद पवार गटाचा दावा

Webdunia
गुरूवार, 9 नोव्हेंबर 2023 (21:19 IST)
अजित पवार गटाने निवडणूक आयोगासमोर चुकीची कागदपत्रे सादर करून दिशाभूल केल्याचा आरोप शरद पवार गटाचे वकिल अभिषेक मनू संघवी यांनी केला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हावर आज महत्त्वाची सुनावणी पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाकडून वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी प्रतिनिधीत्व केले.
 
उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या वकिलांकडून युक्तिवाद करताना शरद पवार गटावर गंभीर आरोप केले होते. शरद पवार हे पक्षात हुकूमशाही राबवून आपल्या मनाला पटेल त्यांची परस्पर नियुक्ती करायचे. याच बरोबर शरद पवार यांचेराष्ट्रीय अध्यक्षपद बेकायदेशीर असल्याचा धक्कादायक युक्तिवाद करण्यात आला होता.
 
अजित पवार गटाच्या या युक्तिवादानंतर आज शरद पवार गटाने आपली बाजू मांडली. शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद करताना शरद पवार गटाची बाजू दोन तास लावून धरली. सुनावणीनंतर माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, “निवडणूक आयोगात जवळपास दीड तास सुनावणी सुरु होती. आजच्या सुनावणीत पहिल्यांदाच युक्तिवादाला करताना आम्ही अनेक धक्कादायक, आश्चर्यकारक आणि अजब गोष्टी निवडणूक आयोगासमोर मांडल्या. अजित पवार गटाने जे मुख्य दस्ताऐवज निवडणूक आयोगासमोर सादर केले होते, त्यापैकी 20 हजार प्रतिज्ञापत्रांमध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत. त्यापैकी 8900 प्रतिज्ञापत्रांचा एक चार्ट बनवून निवडणूक आयोगासमोर सादर केला आहे. ” असा खुलासाही अभिषेक मनु सिंघवी यांनी माध्यमांसमोर दिला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये कोकणात प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेने ३६ विशेष गाड्यांची भेट दिली

LIVE: मुंबईतील रेल्वे स्टेशन आणि लष्करी कार्यालय उडवून देण्याची धमकी

Exit Poll 2026: बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुदुचेरीमध्ये कोणाचे सरकार आहे?

"रिक्षाचालकांनी १५ ऑगस्टपर्यंत मराठी शिकावी," महाराष्ट्राच्या परिवहन मंत्र्यांचे मोठे विधान

एसटी महामंडळाने 'तयार गणवेश' देण्याचा निर्णय घेतला; मात्र, कर्मचाऱ्यांनी याला विरोध दर्शवत 'शिलाई भत्ता' मिळावा यासाठी आंदोलनाचा इशारा दिला

पुढील लेख
Show comments