Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अमरावतीत मागासवर्गीय समाजाच्या लोकांवर जातीय अत्याचार;100 जणांनी गाव सोडून ठोकला पाझर तलावावर मुक्काम

Webdunia
शनिवार, 23 ऑक्टोबर 2021 (16:06 IST)
महाराष्ट्रात जातीचा कलंक पुसता पुसल्या जात नाही फुले, शाहू आंबेडकरांच्या या महाराष्ट्रात पुरोगामी विचारांच्या राज्यात अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे तालुक्यातील दानापूर येथील जातीय द्वेषातून होणाऱ्या अत्याचाराला कंटाळून दानापूर येथील शंभर अनुसूचित समाजाच्या लोकांनी गाव सोडले असून गावाशेजारील पाझर तलावाजवळ आश्रय घेतला असून त्यामुळे जो पर्यंत न्याय मिळत नाही तो पर्यंत गावात परतणार नसल्याचा निर्णय या गावकऱ्यांनी घेतला आहे त्यामुळे आता या नागरिकांचे घरदार बेवारस झाले असून गावातील त्यांच्या मालमत्तेच्या सरक्षणाची जबाबदारी ही प्रशासनाची राहील असा पवित्रा गावकऱ्यांनी घेतल्याने सध्या खळबळ उडाली आहे.
 
दानापूर येथील दलित बांधवाची दानापूर शेत शिवारात शेती आहे. याच शिवारात मुख्य सरकारी पांदणच्या एक शेत पलीकडे या दलितांची शेती आहे. परंतु गावच्या सवर्णांनी या दलितांना त्यांच्या शेतात जाणारा पिढीजात वहीवाटीचा रस्ताच बंद केला. त्यामुळे त्यांची मशागत व इतर शेती कामे खोळंबली. ऐन पेरणीच्या वेळी ट्रॅक्टर अडवुन त्यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप दलित बांधवांचा आहे. या ठिकाणी आंदोलन करत असूनही दोन दिवसांपासून तोडगा निघाला नाही तर प्रकरण सामंजस्याने मिटवू अस चांदुर रेल्वेचे तहसीलदार राजेंद्र इंगळे यांनी सांगितले.

संबंधित माहिती

ऊत्तर प्रदेशमध्ये उद्योगपतीची हत्या, मित्राने केली आत्महत्या

पीएम नरेंद्र मोदींनी सांगितले, का दुखावले गेले अखिलेश यादव

घाटकोपर होर्डिंग प्रकरण : मलब्यामधून खराब अवस्थेत निघाल्या 73 गाड्या, 4 दिवसानंतर रेस्क्यू ऑपरेशन संपले

4 जूनला निवृत्त होतील PM, उद्धव ठाकरेंनी मोदींच्या बॅक टू बॅक रॅलीवर उठवले प्रश्न

नाल्यात सापडला 4 वर्षाच्या मुलाचा मृतदेह, संतप्त लोकांनी शाळा पेटवली

पुणे विमानतळाच्या धावपट्टीवर एअर इंडियाच्या विमानाला अपघात, 180 प्रवासी सुखरूप बचावले

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये होईल पाऊस, IMD ने घोषित केला अलर्ट

जर बहुमत मिळाले नाही तर काय होईल BJP चा प्लॅन-बी? अमित शहांनी सोडले मौन, केजरीवालांवर साधला निशाणा

शरद पवार यांनी पीएम नरेंद्र मोदी यांच्यावर टाकला कटाक्ष, म्हणले-'जेव्हा सीएम होते तेव्हा विकास मध्ये रुची होती आणि आता तर बस....'

मधुमेह, हृदय, लिव्हर यासह अनेक आजारांसाठी 41 औषधे स्वस्त करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

पुढील लेख
Show comments