Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्रेयवादावरुन फडणवीसांचा महाविकास आघाडीच्या नेत्यांना टोला

Webdunia
शनिवार, 19 फेब्रुवारी 2022 (21:36 IST)
श्रेयवादावरुन राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना टोला लगावला आहे. नेते मंडळी काही झाले तर श्रेय घेत असतात. एखाद्याच्या घरात मुलगा झाला तर ते आमच्या कृपेनेच झाला असल्याचे म्हणतात आणि श्रेय घेत असतात. राज्य सरकार आणि भाजप नेत्यांमध्ये भ्रष्टाचारावरुन आरोप प्रत्यारोप सुरु असताना आता देवेंद्र फडणवीसांनी श्रेय घेण्यावरुन महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. फडणवीस विकास कामांचे लोकार्पण करण्यासाठी ठाणे दौऱ्यावर होते. यावेळी एका कार्यक्रमात संबोधित केले आहे.
 
भाजप आमदार संजय केळकर यांनी ठाण्यातील मोडकळीस आलेल्या अधिकृत इमारतींबातच्या निमांना मंजुरी मिळवून घेतली होती. परंतु याची अंमलबजावणी करण्यात दिरंगाई झाली. या कामांचे श्रेय घेण्यासाठी अंमलजबाणी रखडवली गेली का? असा सवाल फडणवीसांनी केला आहे. तसेच अलीकडच्या काळात काही लोकांचा प्रॉब्लेम असा आहे की, कशाचेही श्रेय ते घेतात, एखाद्याच्या घरात लग्न असेल तर तसेच एखाद्याच्या घरात मुलगा झाल्यास तो आमच्या प्रेरणेने झाला. अशा प्रकारचे वेगवेगळे श्रेय घेण्याचे अनेकांचा प्रयत्न असतो. ज्याचे त्याचे श्रेय हे ज्याला त्याला मिळत असते आणि लोक ते देत असतात. आपण फक्त काम करत राहायचे असते असा टोला फडणीसांनी लगावला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कथा बायजाबाईंची

Death Line on Hand: हाताच्या रेषांवरून मृत्यू कधी आणि कसा होईल हे जाणून घ्या, हस्तरेषाशास्त्र काय म्हणते ते जाणून घ्या

ऊँ म्हणा आणि ही वस्तू तुमच्या पर्समध्ये ठेवा, तुमचे घर पैशांनी भरून जाईल

लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिपला मजेदार बनवण्यासाठी हे 5 टिप्स अवलंबवा

सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने खाल्ल्याने होतात हे 5 आश्चर्यकारक आरोग्य फायदे

सर्व पहा

नवीन

मोदी सरकारचा प्रत्येक अर्थसंकल्प म्हणजे निवडणूक पॅकेज… संजय राऊत यांनी टोला लगावला

मुंबई विमानतळावर अपघातात परदेशी प्रवाशासह 5 जण जखमी

गुजरातमध्ये भीषण अपघात, भाविकांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळून पाच जणांचा मृत्यू

नाशिक पोलिसांनी छापा टाकून 5 देशी बनावटीचे पिस्तूल जप्त केले

LIVE: देशातील पहिले AI विद्यापीठ महाराष्ट्रात बांधले जाणार

पुढील लेख
Show comments