Festival Posters

शेतकऱ्यांच्या संपामध्ये एका शेतकऱ्याचा मृत्यू

Webdunia
शुक्रवार, 2 जून 2017 (11:27 IST)

शेतकऱ्यांच्या संपामध्ये एका शेतकऱ्याचा जीव गेला आहे. येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल टोल नाक्यावरील किसान क्रांती मोर्चात सहभागी असलेल्या अशोक मोरे यांचं हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं आहे. पिंपळगाव जलाल टोलनाक्यावर आंदोलन सुरु असताना पोलीस आणि शेतकऱ्यामध्ये झटापट झाली. यावेळी लाठीचार्ज सुरु झाला. त्यानंतर मोरे हे पळत असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचं उपचारापूर्वीच निधन झालं.

दुसरीकडे पिंपळगाव जलाल टोल नाक्यावरील तणाव वाढला असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून कलम १४४ लागू करण्यात आले आहे. या परिसरात बुधवारी संध्याकाळी १ जून रोजी पोलिस आणि आंदोलक यांच्या मध्ये तणाव निर्माण होवून पोलिसानावर दगडफेक झाली होती.पिंपळगावला आंदोलन कर्त्यांना पळवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. तसेच हवेत गोळीबार करत अश्रू धुराच्या नळकांड्या फोडल्या. यात बापू जाधव नावाच्या शेतकऱ्याला नळकांडी लागल्याने तो जखमी  झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.तर पोलिस अधिकारी सुद्धा जखमी झाले होते.त्यामुळे अजून स्थिती खराब होवू नये यासाठी १४४ लागू झाले असून २ जून दुपारी ४ पर्यंत हे लागू राहणार आहे.या कलमा अंतर्गत ५ पेक्षा जास्त लोक एका ठिकाणी येऊ शकत नाही. जर आले तर कलम १४४ चे  उल्लंघन समजल्या जाते आणि अटक होऊ शकते.

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

LIVE: पुणे स्थानकात प्रवेश करताना सोलापूर-सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेसचा डबा रुळावरून घसरला

दक्षिण सूडान मध्ये विमान कोसळले, १४ जणांचा मृत्यू

अकोला: कार अपघातात १४ वर्षीय मुलाचा मृत्यू, गावकऱ्यांचे रस्ता रोको आंदोलन

पुणे स्थानकावर सोलापूर-सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेसचे डबा रुळावरून घसरला

उकाड्यात दिलासा मिळण्यासाठी दुकानदाराने भटक्या कुत्र्यांसाठी दुकानाचे दरवाजे उघडले; व्हिडिओ व्हायरल

पुढील लेख
Show comments