Dharma Sangrah

शेतकऱ्यांच्या संपामध्ये एका शेतकऱ्याचा मृत्यू

Webdunia
शुक्रवार, 2 जून 2017 (11:27 IST)

शेतकऱ्यांच्या संपामध्ये एका शेतकऱ्याचा जीव गेला आहे. येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल टोल नाक्यावरील किसान क्रांती मोर्चात सहभागी असलेल्या अशोक मोरे यांचं हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं आहे. पिंपळगाव जलाल टोलनाक्यावर आंदोलन सुरु असताना पोलीस आणि शेतकऱ्यामध्ये झटापट झाली. यावेळी लाठीचार्ज सुरु झाला. त्यानंतर मोरे हे पळत असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचं उपचारापूर्वीच निधन झालं.

दुसरीकडे पिंपळगाव जलाल टोल नाक्यावरील तणाव वाढला असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून कलम १४४ लागू करण्यात आले आहे. या परिसरात बुधवारी संध्याकाळी १ जून रोजी पोलिस आणि आंदोलक यांच्या मध्ये तणाव निर्माण होवून पोलिसानावर दगडफेक झाली होती.पिंपळगावला आंदोलन कर्त्यांना पळवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. तसेच हवेत गोळीबार करत अश्रू धुराच्या नळकांड्या फोडल्या. यात बापू जाधव नावाच्या शेतकऱ्याला नळकांडी लागल्याने तो जखमी  झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.तर पोलिस अधिकारी सुद्धा जखमी झाले होते.त्यामुळे अजून स्थिती खराब होवू नये यासाठी १४४ लागू झाले असून २ जून दुपारी ४ पर्यंत हे लागू राहणार आहे.या कलमा अंतर्गत ५ पेक्षा जास्त लोक एका ठिकाणी येऊ शकत नाही. जर आले तर कलम १४४ चे  उल्लंघन समजल्या जाते आणि अटक होऊ शकते.

सर्व पहा

नक्की वाचा

पत्नी अजूनही तिच्या माजी प्रियकरावर प्रेम करत असेल तर काय करावे?

दररोज कमी पाणी पिण्याची सवय मुतखड्याचा धोका वाढवू शकते

वॅक्सिंग करताना या टिप्स अवलंबवा

मकर संक्रांतीला मासिक पाळी आल्यावर काय करावे

२०२६ मध्ये या ४ राशींचे भाग्य पूर्णपणे बदलेल, तुम्ही तयार आहात का?

सर्व पहा

नवीन

शिखर धवनने सोफी शाइनशी साखरपुडा केला

पैसे आणि जमिनीच्या लोभाने, सासऱ्याने सुनेच्या हत्येचा रचला कट; गोंदिया जिल्ह्यातील घटना

रस्त्यावरील कुत्र्यांना खायला घालणाऱ्यांनी त्यांना घरी घेऊन जावे; मृत्यू किंवा जखमी झाल्यास राज्य सरकारकडून भरपाई आकारली जाईल-सर्वोच्च न्यायालय

आता 10 मिनिटांत डिलिव्हरी सेवा होणार नाही, केंद्र सरकारने बंदी घातली

एलिसा हिलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली

पुढील लेख
Show comments