Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

समाजकंटक शेतकऱ्यांच्या जीवावर दुष्काळात काढलेले सोयाबीन जाळून टाकले

Webdunia
शनिवार, 20 ऑक्टोबर 2018 (08:00 IST)
लातूर जिल्ह्यावर यंदा पावसाने सूड उगवला आहे. सरकारही लक्ष द्यायला तयार नाही. अशा अवस्थेत कसंबसं पीक काढून शेतकर्‍यांनी रचलेली सोयाबीनची गंजच पेटवून देण्याचा प्रताप पानचिंचोली गावात घडला आहे. पानचिंचोलीत ऋषी होळीकर या तरुण शेतकर्‍याने तीन एकरमध्ये सोयाबीनची लागवड केली होती. फलधारणा होऊन पीक परिपक्व होईपर्यंत त्यांनी प्रतिक्षा केली. पण मळणी यंत्र न मिळाल्याने त्यांनी या सोयाबीनची गंज रचून ठेवली होती. मळणी यंत्र दोन दिवसांनी मिळायचे होते. काल दसरा असल्याने सगळेजण गावात होते. ही संधी साधून अज्ञातांनी ही गंज पेटवून दिली. ही गंज तशीच राहिली असती तर किमान ३० क्विंटल सोयाबीन निघाले असते. त्यातून या शेतकर्‍य़ास एक ते दीड लाख रुपये मिळाले असते. एकीकडून आस्मानी संकट मारते, दुसरीकडून सुलतानी संकट हातात तलवार घेऊन तयारच असते, आता गावातलेच शत्रू आपल्या विकृत समाधानासाठी असे प्रयत्न करीत आहेत. 
 
या प्रकरणी तलाठ्याचा पंचनामा झाला असून आता पोलिसात तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.  

संबंधित माहिती

घाटकोपर होर्डिंग घटनेतील मुख्य आरोपीला राजस्थानमधून अटक

Covishield नंतर आता Covaxin चे साइड इफेक्ट्स समोर आले, तरुण मुलींवर अधिक प्रभाव!

PoK आमचे होते, आहे आणि राहणार, लवकरच त्याचा भारतात समावेश केला जाईल

महादेव बेटिंग ॲप प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, छापा टाकून 96 जणांना अटक

प्रेयसीला आधी मनाली फिरवले नंतर हत्या करुन बॅगेत भरले

ब्रिटनने भारतीय मसाल्यांच्या आयातीवर कडक निर्बंध लादले

तंबाखू दिली नाही म्हणून रागाच्या भरात पिता-पुत्राने केली हत्या

मुंबई मध्ये पीएम नरेंद्र मोदींच्या रोड शो ला संजय राऊत का म्हणाले अमानवीय?

Swati Maliwal Assault Case स्वाती मालीवाल यांच्या घरी पोहोचले पोलीस

राजस्थानमध्ये भीषण अपघात, 5 लोकांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments