Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सरकार आम्हाला इच्छामरण द्या या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मागितली परवानगी

farmer-wants-to-commit-ichhamaran
Webdunia
बुधवार, 10 जुलै 2019 (09:51 IST)
नगर येथील जामखेड तालुक्यातील खर्डा भागातील अमृतलिंग लघू पाटबंधारे प्रकल्पाच्या सांडव्याचे काम नवीन आराखड्यानुसार करावे, अन्यथा आम्हाला इच्छा मरणाची परवानगी द्यावी, असे निवेदन प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांनी जामखेडच्या तहसिलदारांना दिले. नगरचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्याच तालुक्यातील शेतकऱ्यांनी इच्छामरणाची परवानगी मागितल्याने खळबळ उडाली, खर्डा, नागोबाचीवाडी परिसरासाठी वरदान ठरणाऱ्या अमृतलिंग प्रकल्पाच्या कामास ६ मे १९९९ रोजी मंजुरी मिळाली होती. शेतकऱ्यांच्या जमीनीही संपादीत झाल्या. मात्र जमीनीच्या मोबदल्यासाठी शेतकऱ्यांना वेळोवेळी आंदोलने करावी लागली होती. भरपाई मिळावी, यासाठी एका प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याने खर्डा येथे विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर अमृतलिंग प्रकल्पाच्या प्रकल्पग्रस्तांच्या मागणीकडे प्रशासनाचे लक्ष गेले होते. निधीअभावी या प्रकल्पाचे काम रखडले गेले होते. आमदार प्रा. राम शिंदे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतर त्यांनी आपल्या मंत्रीपदाच्या माध्यमांतून रखडलेले काम मार्गी लावण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. परंतु, निधी आल्यानंतर तलावाच्या सांडव्याचे सुरू असलेले काम सदोष असल्याच्या तक्रारी मागील १९ वर्षांपासून प्रकल्पग्रस्तांकडून होत आहेत. सांडव्याच्या सदोष कामामुळे उरलेल्या जमीनी पाण्यात जाण्याच्या भीतीने शेतकरी वर्ग अस्वस्थ झाला आहे.आजघडीला अमृतलिंग प्रकल्पाचा सदोष पद्धतीने सांडवा झाल्यास प्रकल्प भरल्यानंतर पाणी वेगांत येऊन गट नं. १२७ मधील शेतकऱ्यांच्या जमीनी वाहून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. जर असे झाले तर आधीच प्रकल्पबाधीत असणारे शेतकरी पुर्णपणे भूमीहीन होतील. इच्छा मरणाची मागणी करणाऱ्या निवेदनावर प्रमोद सुर्वे, रामहरी खाडे,सुर्यभान खाडे, संजय सुर्वे, बापू सुर्वे आधी परिसरातील शेकडो शेतकऱ्यांच्या सह्या आहेत. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चारधामची यात्रा यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? यामागील धार्मिक कारण जाणून घ्या...

Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती

लग्नात जेवण करताना या चुका करू नका, वास्तु नियम पाळा अन्यथा आरोग्य बिघडू शकते

स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील

उन्हाळ्यात सेवन करा थंडगार Fennel syrup

सर्व पहा

नवीन

नाशिकात जाधव बंधूंच्या हत्येप्रकरणी एसआयटीने तपास तीव्र केला, 5 संशयितांना अटक

पहलगाम हल्ल्यातील दोषींना सोडणार नाही, पीडितांना न्याय मिळेल', पंतप्रधान मोदी मन की बात मध्ये म्हणाले

LIVE: मुंबईत दोन गटांमध्ये हाणामारी,3 जण जखमी, दुकानांची तोडफोड

मुंबईत दोन गटांमध्ये हाणामारी,3 जण जखमी, दुकानांची तोडफोड

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड यांची तुरुंगात प्रकृती बिघडली, उपचार सुरू

पुढील लेख
Show comments