Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शेतक-यांना मिळणार इतर राज्यातील शेती उद्योगाची माहिती

Webdunia
गुरूवार, 21 डिसेंबर 2023 (09:02 IST)
लातूर : जिल्ह्यातील शेतक-यांसाठी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन २०२३-२४ अंतर्गत मनुष्यबळ विकास कार्यक्रमांतर्गत राज्याबाहेर अभ्यास दो-याअंतर्गत प्रक्षेत्र भेटीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. शेतक-यांना इतर राज्यातील शेती उद्योगाची माहिती व्हावी, यासाठी अभ्यास दौ-याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी इच्छुक शेतक-यांनी ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवसांब लाडके यांनी केले आहे. शेतक-यांमध्ये फलोत्पादन विषयक जिज्ञासा व आवड निर्माण करण्याच्या हेतूने तसेच फलोत्पादनाची प्रतवारी, हाताळणी शेतस्तरावर करावयाची प्रक्रिया, उद्योग स्थापन करणे, फलोत्पादनाच्या विपणन व्यवस्थेबाबतचा अभ्यास करण्यासाठी हा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे. आधुनिक लागवड तंत्रज्ञानाबाबत व काढणी पश्चात तंत्रज्ञानाबाबत सखोल शास्त्रोक्त्त ज्ञान उपलब्ध करुन देणे व या माध्यमातून शेतक-यांनी स्वत:ची व त्याचबरोबर समूहाची फलोत्पादन विषयक शेती उन्नत करणे हा राज्याबाहेरील अभ्यास दौ-याचा उद्देश आहे.
 
अभ्यास दौरा राबवताना भेटीच्या ठिकाणांमध्ये परराज्यातील कृषी विद्यापीठ, राष्ट्रीय कृषी संशोधन केंद्र फलोत्पादन क्षेत्रात विशेष काम करणा-या खाजगी कंपन्या, संस्था कृषी विज्ञान केंद्र, फळबाग, भाजीपाला, फुले लागवड, विदेशी फळपिक लागवड आधुनिक तंत्रज्ञान जाणून घेता येईल. अभ्यास दौ-याचा कालावधी हा जास्तीत जास्त ७ दिवसांचा राहील. यामध्ये प्रवास खर्च निवास व भोजन व्यवस्था, प्रशिक्षण साहित्य इत्यादी बाबींचा समावेश राहील. प्रति लाभार्थी ठरवून दिलेल्या मापदंडापेक्षा जादा लागणारा खर्च लाभार्थ्याला स्वत: करावा लागेल. या अभ्यास दौ-याअंतर्गत महिला किंवा अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतक-यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच शेतकरी उत्पादक कंपनी व शेतकरी गटातील सदस्यांना देखील प्राधान्य देण्यात येणार आहे. अभ्यास दौ-यासाठी फळबाग लागवड, भाजीपाला लागवड, फुले लागवड करणा-या, शेडनेट गृह व हरितगृह उभारणी, फळ प्रक्रिया इत्यादीबाबत इच्छुक असणा-या शेतक-यांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी किंवा संबंधित उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयाकडे विहित नमुन्यात आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषीअधिकारी लाडके यांनी केले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पिण्याच्या पाण्याच्या बाटलीमध्ये कमोडच्या सीटपेक्षा जास्त जंतू असतात? संशोधक काय इशारा देतात? वाचा

शिंदे सरकारने स्पर्धा परीक्षांमधील अनियमितता रोखण्यासाठी विधानसभेत विधेयक मंजूर केले

भाजपने 24 राज्यांचे प्रभारी आणि सहप्रभारी घोषित केले जावडेकरांसह या नेत्यांवर मोठी जबाबदारी

Road Accident : पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर तीन वाहनांचा भीषण अपघात, एक ठार

कार्ला -मळवली पुलावरून एक जण वाहून गेला, शोधण्याचे कार्य सुरु

सर्व पहा

नवीन

अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी,17 जुलै रोजी सुनावणी

केरळमध्ये 'मेंदू खाणाऱ्या' अमिबा संसर्गामुळे मुलाचा मृत्यू

Brain Eating Amoeba ने घेतला 14 वर्षाच्या मुलाचा जीव, जाणून घ्या किती धोकादायक आहे

1 रुपयात पीक विमा योजनेसाठी अर्ज करताय? मग आधी या 5 गोष्टी लक्षात ठेवा

मुलींना लहान वयातच पाळी येणं धोकादायक का आहे? त्याची कारणं काय आहेत?

पुढील लेख
Show comments