Marathi Biodata Maker

मुलगी पळून गेल्यामुळे बापाची आत्महत्या

Webdunia
सोमवार, 15 नोव्हेंबर 2021 (19:09 IST)
एक घटना औरंगाबादमध्ये घरात आपल्या मुलीचे लग्न अवघ्या ५ दिवसांवर येऊन ठेपले असल्याने बाप मुलीच्या लग्नाची सर्व तयारी करण्यात व्यस्त होता. मात्र, इकडे मुलीच्या मनात तर दुसराच विचार सुरु होता. अवघ्या ५ दिवसानंतर लग्न तोंडावर आले असताना मुलगी पळून गेली, आणि आता समाजात बदनामी होणार, लोकांना काय तोंड दाखवू या भीतीने मुलीच्या बापाने आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना घडलिया आहे. ही घटना शनिवारी रात्री घडली असून, औरंगाबाद शहरातील संग्राम नगर उड्डाण पूलाजवळ घडलेल्या (Aurangabad suicide) या घटनेतील मृताची रविवारी सकाळी ओळख पटली. दरम्यान, बापाने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली होती. या चिठ्ठीत आपल्या मुलीला पुन्हा घरात घेऊ नका असं म्हटलं असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे औरंगाबाद शहरात (Aurangabad city) हळहळ व्यक्त होत आहे.
 
नेमकं चिठ्ठीत काय लिहिलं आहे?
आपली मुलगी पळून गेल्याचं प्रचंड दुख वडिलांना झाले होते. दरम्यान, त्यांनी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या देखील केली. दरम्यान, त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी पँटच्या खिशात एक चिट्ठी लिहून ठेवली होती. त्यात त्यांनी पत्नीला उद्देशून लिहिले होते, ‘मी जग सोडून जात आहे. माझ्या मृत्यूनंतर मुलीला कधीही आपल्या घरात प्रवेश देऊ नको. माझ्या मुलाचे लग्न चांगले लाव. तू कायम आठवणीत राहशील,  मात्र त्या मुलीला आता माझ्या घरात स्थान नाही’. या मजकुराखाली सदर व्यक्तीने सही केली होती. जवाहरनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष पाटील यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी उड्डाण पुलाजवळ धाव घेतली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

Gopal Krishna Gokhale Jayanti 2026 : गोपाल कृष्ण गोखले जयंती

अवकाळी पावसाचा तडाखा: साताऱ्यातील पाटण तालुक्याला सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने झोडपले

10th results दहावीच्या परीक्षेत मातृभाषेत मराठी विषयात ९४,५४४ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले; चिंतेची बाब समोर आली

बंगालमध्ये आता खऱ्या विकासाला सुरुवात होईल! कोलकात्यात दाखल झालेल्या एकनाथ शिंदे यांनी डबल-इंजिन सरकारवर विश्वास व्यक्त केला

संतप्त प्रियकराने प्रेयसीच्या लग्नात मंडपाला लावली आग; नागपूर मधील घटना

पुढील लेख
Show comments