Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लातूर जिल्ह्यात पिता- मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू

Webdunia
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2024 (10:03 IST)
लातूर जिल्ह्यात जळकोट तालुक्यात मल्हिप्परगा गावात तलावाच्या पाण्यात गुऱ्यांना अंघोळीला घेऊन गेलेल्या शेतकरी वडील आणि मुलाचा बुडून मृत्यू झाला. 

सदर घटना 17 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास घडली. शेतकरी तिरुपती बाबुराव पवार हे आपल्या 12  वर्षाच्या मुला नामदेवसह शेताच्या जवळ असलेला तलावात गुरांना अंघोळीसाठी घेऊन गेले असता एक बैल खोल पाण्यात जाऊ लागला त्याला वाचवण्यासाठी 12 वर्षाचा नामदेव हा किनाऱ्यावर आणण्यासाठी गेला आणि पाण्याची खोली न कळल्यामुळे तो पाण्यात बुडू लागला. 

त्याला बुडताना पाहून तिरुपती देखील पाण्यात गेले आणि पाण्यात बुडून दोघांचा दुर्देवी मृत्यू झाला. 
घटनेची माहिती मिळतातच पोलीस घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी दोघांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठविले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि चार मुली असा परिवार आहे. या घट्नेनन्तर  गावात शोककळा पसरली आहे. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे. 
Edited By - Priya Dixit 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

मीराबाई चानूची कारकीर्द संपलेली नाही, प्रशिक्षकाने दिले मोठे वक्तव्य

पुण्यात आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे पंतप्रधानाच्या हस्ते आज उदघाटन

पुण्यात कामाच्या ताणामुळे सी ए तरुणीचा दुर्देवी मृत्यू

वरिष्ठ आयपीएस अधिकारी संजय पांडे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

हंटर बायडेनला बंदुकीप्रकरणी 4 डिसेंबरला शिक्षा सुनावण्यात येणार

पुढील लेख
Show comments