Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सोलापुरात घरगुती वादाला कंटाळून महिलेने तलावात उडी घेतली, लोकांनी वाचवले तिचे प्राण

Webdunia
मंगळवार, 21 मे 2024 (16:23 IST)
सोलापूरमध्ये एका महिलेने आत्महत्या करण्याच्या उद्देशाने छत्रपती संभाजी महाराज तलावात उडी घेतली. वेळीच नागरिकांनी आरडाओरड करून बोटिंगमध्ये काम करणाऱ्या तरुणांनी पाण्यात उडी घेत तिचा जीव वाचवला. 
नागरिकांनी वेळीच प्रसंगावधान राखत सतर्कता दाखवल्यामुळे महिलेचा जीव वाचला. 
 
सदर घटना सोमवार दुपारची असून सोलापुरातील छत्रपती संभाजी महाराज तलावाजवळ एक महिला पिवळा ड्रेस मध्ये उभी होती.अचानक या महिलेने पाण्यात उडी घेतली. तिथे उपस्थित असणाऱ्या नागरिकांच्या लक्षात ही गोष्ट आल्याने त्यांनी आरडाओरड केली आणि तिला वाचविण्यासाठी बोटिंग क्लब मध्ये काम करणाऱ्या तरुणांनी ताबडतोब पाण्यात उडी घेत तिचा जीव वाचवला. मिळालेल्या माहितीनुसार घरगुती वादाला कंटाळून तिने असं केलं.ही सम्पूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 
 
समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक पिवळा सलवार सूट घातलेली महिला तलावाजवळ उभी असल्याचे दिसत आहे.तिने आपले तोंड झाकले आहे. अचानक ती पाण्यात उडी घेते. तिथे उपस्थित लोकांनी तिला वाचवण्यासाठी आरडाओरड केला नंतर बोट क्लबचे तीन कर्मचारी पाण्यात उडी घेतात आणि तिला वाचवण्यासाठी ट्यूब देतात मात्र ती ट्यूब धरत नाही. तर दोन कर्मचाऱ्यांनी तिला ओढत बाहेर काढले आणि तिचा जीव वाचवला.या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 
 
Edited by - Priya Dixit  
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मान्सूनने अख्खा भारत व्यापला, जुलैत पाऊस कसा असेल? जाणून घ्या

Weather News : राज्यात जुलै महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस कोसळण्याची शक्यता

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचे मतदारांना आवाहन

डोनाल्ड ट्रंप यांना कॅपिटल हिल दंगलप्रकरणी सुप्रीम कोर्टाचा दिलासा, न्यायालयाने काय म्हटलं? वाचा

विधान परिषद सभागृहात शिवीगाळ प्रकरणी अंबादास दानवे यांचं निलंबन

सर्व पहा

नवीन

Hathras incident: हाथरस दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपयांची भरपाई जाहीर

180 कोटी रुपयांचे कर्ज न भरल्याचे प्रकरण, विजय मल्ल्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी

हाथरसमध्ये सत्संग कार्यक्रमात झालेल्या चेंगराचेंगरीतील मृतांचा आकडा 100 पेक्षा जास्त

नरेंद्र मोदींचं राहुल गांधींना 'बालक बुद्धी' संबोधून प्रत्युत्तर पण 'मणिपुरा'त वाहून गेलं भाषण

भारत न्याय संहिता लागू; यापुढे जुन्या IPC कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यांवर काय परिणाम होतील?

पुढील लेख
Show comments