Festival Posters

फटाक्यांमुळे अनेक ठिकाणी आग

Webdunia
शनिवार, 6 नोव्हेंबर 2021 (17:39 IST)
गेल्यावर्षी दिवाळीदरम्यान फटाक्यांमुळे व कचऱ्याला आग लागून नऊ घटना घडल्या होत्या, तर यंदा ते प्रमाण १७वर पोहोचले आहे. फटाक्यांमुळे लागलेल्या या आगींवर अग्निशमन विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने तात्काळ नियंत्रण मिळवित मोठी हानी टाळली आहे. तर, ठाणे शहरात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फटाक्यांमुळे सर्वाधिक आग लागल्याच्या घटनांची नोंद या विभागाकडे करण्यात आली आहे.

यावर्षी ठाणे शहरात दिवाळीदरम्यान म्हणजेच ६ ते ९ नोव्हेंबरपर्यंत फटाके आणि फटाक्यांच्या कचऱ्यामुळे आग लागलेल्या घटना या लोकमान्यनगर, कळवा, वागळे, वर्तकनगर, माजीवाडा-मानपाडा, दिवा, उथळसर, नौपाडा-कोपरी परिसरात घडल्या आहेत. या चार ते पाच दिवसांत शॉट सर्किटमुळे, फटाके, कचरा अशा कारणांमुळे एकूण ५२ ठिकाणी आग लागल्याच्या घटनांची नोंद आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे झाली आहे. तर, गेल्या वर्षी दिवाळीच्या पाच दिवसांत २० ठिकाणी आग लागल्याची नोंद आहे. फटाक्यांमुळे तसेच शॉट सर्किटमुळे जरी आग लागल्याच्या घटना असल्या तरी यावर्षी या घटना दुप्पट वाढल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

सर्व पहा

नवीन

LIVE: नागपुरात रक्तरंजित बर्थडे पार्टी, छत्रपती चौकात ऑटोरिक्षातून उतरताच हल्ला

अंधेरी पश्चिममध्ये बनावट दुधाचे रॅकेट उघडकीस, 7 जणांना अटक

या वर्षी भारत आणि पाकिस्तान यांच्यात दोन सामने होतील

जसप्रीत बुमराहने इतिहास रचला आणि असा पराक्रम करणारा तो पहिला भारतीय गोलंदाज बनला

पाणी नाही, विष वाटले... इंदूरमध्ये विषारी पाण्यामुळे झालेल्या मृत्यूंवरून राहुल गांधींनी सरकारवर निशाणा साधला

पुढील लेख
Show comments