Dharma Sangrah

उमदीत टोळी युद्ध, दोघांचा खून, एक चिंताजनक

Webdunia
बुधवार, 9 मार्च 2022 (15:02 IST)
सांगलीतील जत तालुक्याच्या उमदी येथे दोन टोळी युद्धाचा मंगळवारी रात्री भडका उडाला. या भडक्याने दोन तरुणांचा बळी घेतला आहे. दोघा तरुणांना धारधार शत्राने वार करून निर्घृण खून करण्यात आले. तर एक जण गंभीर जखमी असून त्याचीही प्रकृती चिंताजनक बनली आहे. उमदी पंढरपूर मार्गावर हा थरार घडला आहे. या दुहेरी खुनाच्या घटनेने जत तालुका हादरला आहे. या प्रकरणी संशयित 12 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
 
मदगोंडा नागा बगली (वय 24) व संतोष राजू माळी (वय 23) रा.उमदी अशी मृत तरुणांची नावे आहेत. तर प्रकाश मल्लिकार्जून परगोंड (वय 22) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर सोलापूर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी पोलीस अधिक्षक दीक्षित कुमार गेडाम, उपविभागीय अधिकारी रत्नाकर नवले यांनी भेट दिली आहे. उमदी येथे मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोशल मीडियावरील वादातून आणि पूर्वैमनस्यातून ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून जत येथील एका टोळीचा म्होरक्या, उमदी येथील सहकारी तसेच उमदी येथील एक टोळी यांच्यात सतत संघर्ष सुरू होता. त्याची किनार या घटनेला असल्याचे सांगण्यात येत आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात 14 वर्षांच्या मुलीवर बलात्कार, आरोपीला अटक

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याचा लाच घेताना व्हिडिओ प्रसिद्ध केला

सरकारने इंडिगोविरुद्ध कडक कारवाई केली; एअरलाइनने 10 टक्के उड्डाणे कमी केली

महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या मतदार यादीच्या तारखा बदलल्या, नवीन वेळापत्रक जाहीर

UIDAI चा मोठा निर्णय, आधार फोटोकॉपी बंद होणार; नवीन नियम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments