Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नाशिकला पुराचा धोका, सतर्कतेचे आव्हान

Webdunia
बुधवार, 29 सप्टेंबर 2021 (11:52 IST)
नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. निवासी उपजिल्हाधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भागवत डोईफोडे यांनी नागरिकांना या वेळी सावध राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच धरणांमधून पाण्याचा विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. 
 
गंगापूर धरणातून १५ हजार क्युसेकने विसर्ग करण्यात येणार असल्याने गोदावरी नदीला पूर येणार आहे. नदी लगतच्या रहिवाशांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरीत व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
 
जिल्ह्याच्या काही भागात 29 सप्टेंबर रोजी गडगडाटी वादळासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान केंद्राने दिला असून या संबंधात, नागरिकांनी जीवित आणि मालमत्तेचे नुकसान टाळण्यासाठी सुरक्षित ठिकाणी राहणे आवश्यक आहे. 
 
पूरप्रवण भागातील सर्व गावे, नदी-नालाकाठ परिसरातील नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. कोणीही नदी आणि धरणात प्रवेश करू नये, आपले पशुधन आणि वाहने सुरक्षित ठिकाणी ठेवावे अशा सूचना दिल्या गेल्या आहेत. प्रशासनाने गावांना सावध करण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना करण्याचे आवाहन संबंधित संस्थांना केले आहे.

संबंधित माहिती

अमित शहा यांची सीता मढी आणि मधुबनी मध्ये आज रॅली, केंद्रीय गृहमंत्री यांचा पाचवा बिहार दौरा

कार चालवत असणाऱ्या फार्मासिस्टला आला अटॅक, मृत्यू नंतर देखील होते स्टीयरिंग वर हात

RSS चा तिसरा शैक्षणिक वर्ग नागपुरात सुरु होणार

सुनील छेत्रीने इंटरनॅशनल फुटबॉल मधून घेतला संन्यास, 6 जूनला खेळतील शेवटची मॅच

28 आठवड्यांच्या गर्भालाही जगण्याचा अधिकार, गर्भपाताबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Bomb Threat च्या फ्लाइटमध्ये बॉम्बची अफवा, टॉयलेटमध्ये टिश्यू पेपरवर मेसेज

मुंबई मध्ये 'स्पेशल 26' सारखे कांड, क्राईम ब्रांच सांगून कॅफे मालकाचे घर लुटले

कारमधून मिळाले दोन मृतदेह, मुंबई होर्डिंग अपघात 16 जणांचा मृत्यू

नागपूर मध्ये फ्लाईओपर वरून उडी घेतली महिलेने

पीएम नरेंद्र मोदी यांनी मुंबईमध्ये केला मोठा खुलासा, म्हणाले काँग्रेस अल्पसंख्यांकांना देऊ इच्छित आहे 15 प्रतिशत बजेट

पुढील लेख
Show comments