Festival Posters

पुन्हा एकदा मेघ गर्जनेसह पावसाचा अंदाज

Webdunia
शुक्रवार, 9 एप्रिल 2021 (08:02 IST)
येत्या दिवसांमध्ये राज्यात काही ठिकाणी मेघ गर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. काही ठिकाणी हलका ते मध्यम अशा स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागामार्फत वर्तवण्यात आला आहे. मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणाच्या काही भागात पावसाचा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईने वर्तवला आहे. त्यासोबतच विदर्भातही काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शुक्रवार ९ एप्रिल ते १२ एप्रिल दरम्यान हा पाऊस आणि गारपीटीचा अंदाज मांडण्यात आला आहे. या कालावधीत काही जिल्ह्यांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे. तर काही जिल्ह्यांना सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
 
शनिवार ते रविवार या कालावधीत राज्यात चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया याठिकाणी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. याठिकाणी गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर परभणी, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, वर्धा आणि नागपूर या ठिकाणी हलका ते मध्य स्वरूपाचा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. येत्या शुक्रवारी कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड या भागात मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागामार्फत वर्तवण्यात आला आहे. राज्यात अनेक ठिकाणी उकाड्याचा पारा चढलेला असतानाच या अवकाळी पावसामुळे काही ठिकाणी ढगाळ वातावरण असणार आहे. तर काही ठिकाणी उकाड्यापासून काही कालावधीसाठी दिलासा मिळणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

पुण्यातील हडपसर येथे बॉम्बसारखी एक संशयास्पद वस्तू आढळल्याने रुग्णालयाजवळ घबराट पसरली

गुरुदेवांच्या ७० व्या जन्मोत्सवनिमित्त जागतिक शांततेचा संदेश; १८२ देशांतील लाखो लोकांनी सामूहिक ध्यानात सहभाग घेतला

‘महालक्ष्मी सरस २०२६’ हे यावर्षी संपूर्ण राज्यातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या प्रदर्शनांपैकी एक म्हणून उदयास आले

मोदी सरकारने साखर निर्यातीवर बंदी घातली; साखर कारखाने आणि जागतिक बाजारपेठेवर काय परिणाम होईल?

२००८ च्या रेल्वे भरती हिंसाचार प्रकरणात राज ठाकरे ठाणे न्यायालयात हजर, सर्व आरोप फेटाळले

पुढील लेख
Show comments