suvichar

मराठवाडा, नगरसाठी गंगापूर धारण समुहातून शेवटचे आवर्तन, २९०० क्यूसेस पाण्याचा विसर्ग

Webdunia
मंगळवार, 14 मे 2019 (11:50 IST)
गंगापूर धरण समूहातील दारणा, मुकणे धरणांतून मराठवाडा, अहमदनगर जिल्ह्यांसाठी शेवटचे आवर्तन सोडले असून, २९०० क्यूसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. सोमवारी रात्री उशिरापर्यंत पाणी नांदूरमध्यमेश्वर धरणात पाणी पोहचेल. इगतपुरी तालुक्यातील धरणांमध्ये एकूण फक्त १८ टक्के पाणी साठा शिल्लक आहे. उशिरा का होईना पाटबंधारे विभाग प्रशासनाने पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.  मुकणे, दारणा, वालदेवी, कडवा धरणांतून २ हजार १०० दशलक्ष घनफुट पाणी सोडण्यात येणार असून, दुष्काळात सोडण्यात आलेल्या आवर्तनामुळे दारणा काठच्या भागातील गावांनाही याचा मोठा दिलासा मिळाला आहे.
 
पाणी दारणा धरणातून नदीमार्गे नांदूरमध्यमेश्वरच्या डाव्या व उजव्या कालव्यातून वैजापूर, कोपरगाव, शिर्डी, राहत्याला सोडण्यात आले. पुढील पंधरा दिवस पाणी वहन मार्गावर रोज २२ तास थ्रीफेज वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. अवैध पाणीउपसा करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असून, दारणा, मुकणे नदीचे पाणी आटल्याने पंधरा दिवसांपासून अनेक पाणीपुरवठा योजना बंद पडल्या होत्या. दारणा व मुकणे धरणाचे पाणी संयुक्तरित्या औरंगाबाद, वैजापूर, अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव, शिर्डी, राहता या शहरांची तहान भागविणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

LIVE: अजित पवार विमान अपघातानंतर मुलगा जय पवार यांनी खाजगी चार्टर कंपनीवर गंभीर आरोप केले

US-Iran conflict: कच्च्या तेलाचा दर ८२ डॉलरवर पोहोचला, भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढतील? परिणाम जाणून घ्या

नागपूरमधील एसबीएल एनर्जी लिमिटेडमध्ये मोठा स्फोट; १८ जणांचा मृत्यू

इराणमध्ये अमेरिकेच्या हल्ल्यात २०० हून अधिक लोक ठार, ट्रम्प म्हणाले हल्ले सुरूच राहतील

साडेतीन वर्षांच्या मुलासह वडिलांची ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या, चांदवड मधील घटना

पुढील लेख
Show comments