Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गिरीश महाजन माझे मोठे भाऊ, त्यांनी तेव्हा जे केले तेच मी आता करतोय : गुलाबराव पाटील

Webdunia
शनिवार, 19 फेब्रुवारी 2022 (08:20 IST)
जळगाव शहर मनपात सध्या फोडाफोडीचे राजकारण सुरु असून त्यावरून भाजपचे आ.गिरीश महाजन यांना पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी चांगलाच टोला लगावला आहे. गिरीश महाजन हे माझे मोठे भाऊ असून आम्ही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत आहोत. तेव्हा त्यांनी जे केले तेच मी करतो आहे. निवडणुकीच्या वेळी गिरीशभाऊंनी फोडलेले तेव्हा भाजपात गेलेले अर्धे आमच्याच पक्षाचे होते, असा टोला ना.पाटील यांनी लगावला आहे.
 
जळगाव येथील अजिंठा विश्रामगृहात विद्यार्थी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला. याप्रसंगी ते बोलत होते. गुलाबराव पाटील म्हणाले कि, शिवसेना म्हणजे ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण असे आहे. आपल्या या परिवारात आपण जसे सुख दुःखात काम करतो तसेच आपण पक्षवाढीसाठी काम करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
 
२५० कोटींच्या पाणीपुरवठा योजनांना प्राथमिक मंजुरी
ना.गुलाबराव पाटील यांनी, पाणीपुरवठा योजनेच्या जवळपास २५० कोटींच्या योजनांना प्राथमिक मान्यता देण्याचे काम आज करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे बंधारे बांधले त्यातून पाईपलाईनने पाणी देण्याचे भाग्य मला आज लाभते आहे. पक्ष कोणता यापेक्षा मी पालकमंत्री आहे, जिल्हा माझा आहे. पालकमंत्री म्हणून मी माझे कर्तव्य बजावत पाणी देण्याचे कार्य केले आहे. सर्वाधिक पाणी योजना पूर्ण करण्याचे कार्य मी केले आहे. ज्या-ज्या जिल्ह्यात पालकमंत्री स्वतःच्या जिल्ह्याचा फायदा करतात तसाच फायदा मी करून आणला आहे, असे पालकमंत्री म्हणाले.
 
गिरीश महाजनांना उत्तरप्रदेश घटनेचा विसर
पालकमंत्री म्हणाले कि, शेतसाऱ्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी जप्त करण्याचे कार्य होत असेल तर ते निश्चित चुकीची आहे. शेतकऱ्यांना बुडविले जाते हे म्हणणे चुकीचे आहे. शेतकऱ्यांना मोठी कर्जमाफी देण्याचे कार्य सरकारने केले आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे. हे सरकार शेतकऱ्यांना ८-८ मुलांना चिरडणारे सरकार नाही. मला वाटते गिरीश भाऊ उत्तरप्रदेशचा विसर पडला आहे, असा टोमणा ना.पाटील यांनी लगावला.

संबंधित माहिती

उत्तर प्रदेशमध्ये 5 वार्षांच्या चिमुकल्याची हत्या

सुकमा एन्काऊंटर: पोलीस आणि नक्षलवादींमध्ये लढाई, गोळीबारामध्ये 1 माओवादी ठार

महाराष्ट्रात एका कपलने आवासीय योजनेच्या नावाखाली 1.48 कोटी रुपये लुटले

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकतंत्र संपुष्टात आणता आहेत- अरविंद केजरीवाल

काळ बनले इयरफोन, दोन बहिणींचे मृतदेह मिळाले रेल्वे ट्रॅकवर

'जगामध्ये असे देश जास्त नाही आहे, जिथे....', अमेरिकेने भारताच्या लोकतंत्राला घेऊन दिला मोठा जबाब

महावितरण कर्मचाऱ्याकडून लाच मागितल्या प्रकरणात उप निरीक्षकावर गुन्हा दाखल

मुंबई : 16 लोकांच्या मृत्यू नंतर आता 8 मोठे होर्डिंग काढण्याचे आदेश

महाराष्ट्र : पीएम नरेंद्र मोदींसोबत राज ठाकरे व्यासपीठावर एकत्र, राज ठाकरेंनी केंद्र सरकारचे केले कौतुक

राज्यात पुन्हा येणार मुसळधार पाऊस, या जिल्ह्यांना दिला पावसाचा अलर्ट

पुढील लेख
Show comments