Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गोविंद पानसरे खूनखटला; सुनावणी ५ ऑगस्ट रोजी

Webdunia
बुधवार, 27 जुलै 2022 (22:12 IST)
कोल्हापूर – ज्येष्ठ विचारवंत गोवेंद पानसरे खून प्रकरणाची सुनावणी ५ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. या प्रकरणातील सर्व नऊ संशयितांना न्यायालयासमोर प्रत्यक्ष हजर करण्यात येणार आहे. त्यानंतरच दोषारोप निश्चिती होणार आहे.
 
ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांचा १६ फेब्रुवारी २०१५ रोजी सकाळी गोळया झाडून खून करण्यात आला. राजारामपुरी पोलीस ठाण्यात या खूनाचा गुन्हा नोंद होऊन तपास सुरु आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.एस. तांबे यांच्यासमोर याप्रकरणाची सुनावणी सुरु आहे. मागील सुनावणीवेळी न्यायालयाने अटक असलेल्या सर्व संशयितांना हजर करण्याचे आदेश दिले होते. यामुळे बुधवारी वीरेंद्र तावडे, सचिन अंदुरे,शरद कळसकर,समीर गायकवाड यांना हजर करण्यात आले. मात्र बेंगलोर येथील सहा संशयितांना आदेशाची प्रत वेळेत न मिळाल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले नाही.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments