Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अवयवदानातून चौघा रूग्णांना जीवनदान

Webdunia
सोमवार, 20 जानेवारी 2020 (15:32 IST)
नाशिकमधून ‘ग्रीन कॉरिडोर’च्या माध्यमातून अवयवदानसाठी पुण्यातील बाणेर येथे एका युवकाचे अवयव पोहोचविण्यात आले. यामुळे चौघा रूग्णांना जीवनदान मिळाले आहे.
 
या घटनेत रोजगारासाठी नाशिकमध्ये राहात असलेल्या शर्मा कुटुंबातील कर्ता पुरूष मिलन मोहन शर्मा (३७) एका हॉटेलमध्ये कारागिर म्हणून नोकरी करत होते. नोकरी आटोपून दिंडोरीरोडवरून दुचाकीने घरी परतत असताना शुक्रवारी अपघात झाला. या अपघातात मिलन यांच्या डोक्यास जबर मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले. मागील आठवडाभरापासून त्यांच्यावर शहरातील खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांचा मेंदू मृत घोषित केले. यानंतर कुटुंबियांनी अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. याबाबत विभागीय प्रत्यारोपण समन्वय केंद्राला (झेडटीसीसी) रूग्णालयाकडून माहिती देण्यात आली. केंद्राकडून बाणेर येथील ज्यूपिटर व पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर रूग्णालयात गरजू रूग्ण असल्याचे कळविण्यात आले. त्यानुसार दोन मुत्रपिंड, स्वादुपिंड, यकृत हे अवयव वरील रूग्णालयांमध्ये शनिवारी दुपारी सव्वा चार वाजेच्या सुमारास शहर वाहतूक पोलिसांनी ‘ग्रीन कॉरिडोर’मधून पोहचविण्यात आले. यावेळी सुमारे तीन तासांत २२० किलोमीटर अंतर कापत रूग्णवाहिका बाणेरला रूग्णालयात पोहचली.
 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments