Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दिव्यांग व्यक्तींना खुश खबर शिवशाही बसमध्ये ७० टक्के सवलत

Webdunia
गुरूवार, 7 फेब्रुवारी 2019 (09:00 IST)
एसटी महामंडळाच्या वातानुकूलीत शिवशाही बसेसमधून प्रवास करणार्‍या दिव्यांग व्यक्तीस प्रवास भाड्यात 70 टक्के सवलत देणार आहे. तर त्यांचे प्रवास करणार्‍या साथीदारास प्रवास भाड्यात 45 टक्के सवलत मिळणार आहे. ही चांगली घोषणा परिवहन मंत्री दिवाक रावते यांनी केली. राज्यात महत्वाचे शहरे जोडणारी वातानुकूलीत शिवशाही बस लोकांच्या पसंतीस उतरली असून, राज्यभरात सर्व ठिकाणी प्रवाशांकडून या बसला अत्यंत उत्तम प्रतिसाद आहे. सुरुवातीसबसमध्ये कोणत्याही सामाजिक घटकास सवलत दिली नाही. मात्र नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन ज्येष्ठ नागरीक, पत्रकार यांना शिवशाही बसमधून प्रवासासाठी भाडे सवलत दिली. तर अंध, अपंगांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेऊन केलेल्या विनंतीचा सन्मान म्हणून दिव्यांग प्रवाशांना प्रवास भाडे सवलत दिली आहे असे स्पष्टीकरण परिवहन मंत्री रावते यांनी दिले आहे. एसटी महामंडळाच्या बसमध्ये सध्या अंध आणि अपंगांना साध्या आणि निमआराम बसमधून प्रवासासाठी 75 टक्के सवलत आहे. त्यांच्या साथीदारास 50 टक्के सवलत देण्यात येते. आता या प्रवास भाडे सवलत योजनेत वातानुकूलीत शिवशाही बसचाही समावेश करण्यात आला आहे. दिव्यांगांसाठी असलेल्या सवलत योजनेचे राज्यभरात अंदाजे 2 लाख 82 हजार इतके लाभार्थी असल्याची माहिती त्यांनी दिली.त्यामुळे आता त्यांचा प्रवास सुखकर होणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कथा बायजाबाईंची

Death Line on Hand: हाताच्या रेषांवरून मृत्यू कधी आणि कसा होईल हे जाणून घ्या, हस्तरेषाशास्त्र काय म्हणते ते जाणून घ्या

ऊँ म्हणा आणि ही वस्तू तुमच्या पर्समध्ये ठेवा, तुमचे घर पैशांनी भरून जाईल

लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिपला मजेदार बनवण्यासाठी हे 5 टिप्स अवलंबवा

सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने खाल्ल्याने होतात हे 5 आश्चर्यकारक आरोग्य फायदे

सर्व पहा

नवीन

सरकारी शाळेत आठ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, पोलिसांनी तपास सुरू केला

तो नॅपी धीरेंद्र शास्त्री आहे, मी त्याच्या वयाइतकीच वर्षे तपश्चर्या केली आहे, ममता कुलकर्णी संतापल्या

लग्नात नवरदेवाने 'चोली के पीछे क्या है' गाण्यावर नाच केला, वधूच्या वडिलांनी तोडले लग्न

LIVE: आदित्य ठाकरे शिंदेंच्या शिवसेनाला देशद्रोही टोळी म्हणाले

अर्थसंकल्पावरून काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाडांनी मोदी सरकारवर टीका केली

पुढील लेख
Show comments