Dharma Sangrah

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी संपली

Webdunia
बुधवार, 20 डिसेंबर 2023 (21:16 IST)
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी  बुधवारी (20 डिसेंबर) रोजी संपली आहे.  दोन्ही गटाचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. दरम्यान आता वेध लागले आहेत ते निकालाचे. तेव्हा 10 जानेवारीपर्यंत निकाल देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश असून, तेव्हा अध्यक्ष काय निर्णय घेतात हे पहावे लागणार आहे.
 
शिवसेनेतील अभूतपूर्व बंडानंतर राज्यात सत्तांतर झाले. सध्या शिवसेनेत दोन गट असून, शिंदेची शिवसेना सत्तेत आहे. अशातच ठाकरे गटाने दाखल केलेली शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने आधी 31 डिसेंबरपर्यंत निर्णय घेण्याचे आदेश दिले होते. दरम्यान ही वेळ वाढवून देण्यात यावी

अशी मागणी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली होती. सर्वोच्च न्यायालयाने याला मुदतवाढ देऊन 10 जानेवारी 2024 पर्यंत निकाल देण्याचे निर्देश दिले आहे. याच दरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर मागील तीन महिन्यापासून सुरू असलेली शिवसेना अपात्रता प्रकरणाची सुनावणी 20 डिसेंबर रोजी पूर्ण झाली असून, आता दोन्ही गटातील आमदारांचे निकालाकडे लक्षं लागले आहे. विधानसभा अध्यक्षांसमोरील सुनावणी पूर्ण झाली.

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद, याचिका एकत्रित करणे, त्यानंतर शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट या दोन्ही गटांच्या आमदारांची उलट तपासणी घेऊन साक्ष नोंदवणे आणि अंतिम सुनावणीतील दोन्ही बाजूंचा युक्तिवाद असं करत ही सुनावणी पूर्ण करण्यात आली आहे.
 
या संपूर्ण सुनावणी प्रक्रियेमध्ये दोन्ही बाजूंकडून अनेक दावे-प्रतीदावे, आरोप प्रत्यारोप करण्यात आले. हजारांच्या जवळपास प्रश्न आणि उपप्रश्न दोन्ही बाजूंनी विचारण्यात आले आणि त्यामुळेच या संपूर्ण तीन महिन्यातील सुनावणीमध्ये अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत.
 
Edited by -Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

सरकारचा मोठा निर्णय मनरेगाचे नाव बदलून 'पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना' केले

महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेअंतर्गत ₹165 कोटींचा घोटाळा, सरकारी कर्मचाऱ्यांकडून वसुली सुरू

वैभव सूर्यवंशीच्या शानदार फलंदाजीमुळे भारताने 19 वर्षांखालील आशिया कपच्या पहिल्या सामन्यात युएईला हरवले

अर्शदीपने भारतीय गोलंदाज म्हणून 7 वाईडसह सर्वात लांब षटक टाकले

आशियातील सर्वात मोठे जीसीसी मुंबईत बांधले जाणार, ब्रुकफील्ड 1 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार

पुढील लेख
Show comments