Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गुहागरमध्ये एकाच सरणावर मुलगी-जावई आणि दोन नातवांना मुखाग्नी दिल्याची हृदयद्रावक घटना

Webdunia
रविवार, 22 जानेवारी 2023 (10:20 IST)
कोकणात गुहागर तालुक्यातल्या हेदवी येथे आजीच्या वर्षश्राध्दाला येत असताना मुंबई गोवा महामार्गावर झालेल्या अपघातात एक अख्खं कुटुंब संपलं.रायगड जिल्ह्यातील गोरेगाव रोपोली येथे झालेल्या या अपघातात दहा जणांचा मृत्यू झाला होता. यात पंडित कुटुंबातील पती-पत्नी आणि दोन लहानग्यांचा समावेश होता. या चौघांनाही एकाच सरणावरती अग्नी देण्याची वेळ हेदवी येथील रघुनाथ सखाराम जाधव यांच्या कुटुंबावर आली.महाराष्ट्र टाइम्स ने ही बातमी दिली आहे.
 
या अपघातात रघुनाथ जाधव यांची मुलगी, जावई आणि दोन लहानग्या नातवांना अग्नी देण्याची वेळ रघुनाथ जाधव यांच्यावर आली. तर, एका सरणावर त्यांना त्यांच्या मुलाला अग्नी द्यावा लागला. शेवंती सखाराम जाधव या 103 वर्षांच्या आजी यांचा गेल्यावर्षी मृत्यू झाला होता, त्या आजीच्या वर्षश्राद्धला सगळे येत होते.
 
शुक्रवारी (20 जानेवारी) पहाटे पाच वाजता झालेल्या अपघातात या पाच जणांना मृत्यूने गाठले. यामध्ये नीलेश पंडित (वय 45), त्यांची पत्नी नंदिनी (वय 35), मुलगी मुद्रा (वय 12) आणि मुलगा भव्य (वय 4) यांचा मृत्यू झाला होता. नीलेश पंडित हे हेदवी गावचे जावई असून, भादगाव जवळ डावखोल (तालुका गुहागर) हे त्यांचे मूळ गाव आहे.
 
गावात घरचे कोणी नसल्याने त्यांच्यावरही हेदवी येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले.

Published By- Priya Dixit 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कथा बायजाबाईंची

Death Line on Hand: हाताच्या रेषांवरून मृत्यू कधी आणि कसा होईल हे जाणून घ्या, हस्तरेषाशास्त्र काय म्हणते ते जाणून घ्या

ऊँ म्हणा आणि ही वस्तू तुमच्या पर्समध्ये ठेवा, तुमचे घर पैशांनी भरून जाईल

लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिपला मजेदार बनवण्यासाठी हे 5 टिप्स अवलंबवा

सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने खाल्ल्याने होतात हे 5 आश्चर्यकारक आरोग्य फायदे

सर्व पहा

नवीन

'त्यांचा दृष्टिकोन निरुपयोगी आहे', रामदास आठवलेंची अर्थसंकल्पावर टीका करणाऱ्या विरोधकांवर टीका

LIVE: शिवसेना युबीटीच्या खासदाराला अर्थसंकल्प आवडला

शिवसेना उद्धव गटाच्या खासदाराला बजेट आवडले, म्हणाले- हा मध्यमवर्गाचा विजय आहे

Budget 2025: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अर्थसंकल्पाचं केलं कौतुक, म्हणाले सर्वसामान्यांचा खिसा भरणारा अर्थसंकल्प आहे

भारताने चौथ्या T20 मध्ये 15 धावांनी विजय मिळवला

पुढील लेख
Show comments