Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्रामध्ये भीषण अपघात, ट्रक ने 8 महिलांना चिरडले, 6 महिलांचा मृत्यू

Webdunia
बुधवार, 19 जून 2024 (13:53 IST)
Maharashtra Solapur Accident : महाराष्ट्रात झालेल्या भीषण अपघातामध्ये सहा महिलांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी ट्रक चालकाला घेतले ताब्यात.
 
Maharashtra Accident : महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये झालेल्या भीषण अपघातात सहा महिलांचा मृत्यू झाला आहे. पीडित महिला शेतातील काम आटपून गावाला जाण्यासाठी बसची वाट पाहत होत्या. तेव्हाच जलद गतीने येणाऱ्या ट्रक ने रस्त्याला उभ्या असणाऱ्या महिलांना चिरडले. या सहा महिलांचा जागीच मृत्यू झाला. जेव्हा की दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहे. 
 
हा अपघात सोलापुर जिल्ह्याच्या सांगोला तालुका मध्ये पंढरपुर-कराड रोड वर झाला आहे. सर्व पीडीत  महिला शेतकरी मजूर आहे.  हा अपघात मंगळवारी संध्याकाळी घडला.  पंढरपुर-कराड रोड वर सांगोलाच्या  चिकमहुड गावाजवळ घडला. सांगोला तालुकाच्या कटफल परिसरात आठ महिला शेतात जाण्यासाठी सकाळी निघाल्या संध्याकाळी काम आटपून त्या घरी जाणयासाठी बस ची वाट पाहत होत्या तेव्हा अपघात झाला. 
 
पंढरपुर कडून कराड जाणारा ट्रक (एमएच 50 एन 4757) चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि रस्त्यावर असणाऱ्यांना महिलांना जाऊन धडकला. या अपघाताची माहिती मिळतच सांगोलाचे तहसीलदार संतोष कणसे आणि सांगोला पोलीस निरीक्षक दलबलसोबत अपघातस्थळी पोहचले. नागरिकांच्या मदतीने या महिलांना तात्काळ रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले. पोलिसांनी ट्रकचालकाला ताब्यात घेतले आहे.
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

टी20 विश्व कप विजेता भारतीय टीमचा होईल रोड शो, वानखेडे स्टेडियममध्ये होणार सत्कार

फ्रीज उघडताच लागला विजेचा झटका, आई आणि मुलीचा मृत्यू

Monsoon Update: मुसळधार पावसाचा इशारा, येत्या 24 तासांत या राज्यांमध्ये कोसळणार पाऊस

‘लष्कराकडून 1 कोटींची मदत मिळाली नाही,’ स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या अग्निवीराचे कुटुंबीय म्हणतात...

विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे होतील महाराष्ट्रचे मुख्यमंत्री, सीट शेयरिंग पूर्वीच नेत्याने दिला जबाब

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्र: गुप्त धनाचा लोभ, नरबळी देण्यासाठी चालली होती अघोरी पूजा

स्वामी विवेकानंद पुण्यतिथी

Maharashtra: अंगणवाडी मध्ये मिळणाऱ्या जेवणाच्या पॅकेटात निघाला मेलेला साप

मराठा आरक्षणला घेऊन आली मोठी बातमी

हाथरस चेंगराचेंगरी : या दुर्घटनेमुळे वादात अडकलेल्या बाबांनी प्रसिद्ध केलं पत्र, काय म्हटलं?

पुढील लेख
Show comments