Marathi Biodata Maker

नाशिकपेक्षा हैदराबादमध्ये कांद्याला भाव जास्त कसा? अजित पवारांचा सवाल

Webdunia
शनिवार, 17 जून 2023 (08:45 IST)
जळगाव :कापसाला भाव नसल्याने शेतकऱ्यांच्या घरात कापूस पडून आहे. कांद्याला नाशिक आणि पुणे बाजारपेठेत भाव मिळत नाही. महाराष्ट्रात कांदा पिकवणारे राज्याबाहेर कांदा पाठवत आहेत. नाशिकला मिळणाऱ्या भावापेक्षा हैदराबादला कांद्याला पाच-सहा पट अधिक भाव कसा मिळतो? तेथे जास्त भाव मिळत असेल तर आपल्या सरकारने पणन महासंघाने यात हस्तक्षेप करायला हवा. याबाबत राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अमळनेर येथे पत्रकार परिषदेत केली.
 
राज्यात खतांच्या बियाणांच्या किमती वाढवल्या जात आहेत. बोगस खते, बियाणे विकली जात आहेत. हे रोखण्यासाठी छापे मारले जातात. मात्र छापे मारण्यासाठी जो ग्रुप जातो त्यात मंत्र्यांचा पी.ए. दिसतो. हा कशासाठी असतो? आज राज्यात प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे. सरकारी बदल्यांचे दर ठरलेले आहेत. असे पूर्वी कधी घडले नाही. एक वर्ष या सरकारला होत आले. वर्षात किती गुंतवणूक आली, किती कारखाने राज्यात आलेत कळले पाहिजे. आज महाराष्ट्राची अवस्था ही अत्यंत केविलवाणी झाली आहे. मंत्रिमंडळ विस्तार होत नाही. केवळ 20 मंत्र्यांवर कारभार सुरू आहे. एकेका मंत्र्याकडे तीन ते पाच खाती आहेत. त्यामुळे खात्यांना न्याय मिळत नाही. त्यामुळे विकासाचा विचार करतांना जिल्ह्यांना न्याय हा मिळाला पाहिजे अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

LIVE: वसई-विरारमध्ये भाजपला लक्षणीय यश; अनेक ज्येष्ठ बहुजन विकास आघाडी नेते सामील

वसई-विरारमध्ये भाजपला लक्षणीय यश; अनेक ज्येष्ठ बहुजन विकास आघाडी नेते सामील

पुणे न्यायालयात सावरकर मानहानीचा वाद पेटला, सावरकर कुटुंबाने राहुल गांधींच्या याचिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले

World Wildlife Conservation Day 2025 आज वन्यजीव संवर्धन दिन, इतिहास आणि महत्त्व जाणून घ्या

पुण्यातील हवा विषारी झाली, AQI ३३६ सह मुंबईपेक्षाही अधिक धोकादायक: आरोग्य तज्ज्ञांनी दिला इशारा

पुढील लेख
Show comments