Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हनुमान चालिसा म्हटल्याने देशातील किती प्रश्न सुटले?

Webdunia
गुरूवार, 17 ऑगस्ट 2023 (07:47 IST)
Hanuman Chalisa : मागील काही दिवसांत हनुमान चालिसावरून राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. नवनीत राणा यांच्याकडून सतत हनुमान चालिसावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली जाते.
 
त्यातच, लोकसभेतील अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र तथा खासदार श्रीकांत शिंदे यांनी हनुमान चालिसा वाचवून दाखवत ठाकरे गटावर निशाणा साधला होता. दरम्यान, राणा आणि शिंदे यांच्या याच टीकेला ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एकाचवेळी उत्तर दिले आहे. राणा यांच्या अमरावतीत बोलतांना, ‘हनुमान चालिसा म्हटल्याने देशातील किती प्रश्न सुटले?’ असा खोचक टोला अंधारे यांनी लगावला आहे.
 
आपण कधीच विचार करत नाही, हनुमान चालिसा म्हटली म्हणजे म्हटली. श्रीकांत शिंदे यांनी हनुमान चालिसा म्हटली, हो म्हटली. पण, हनुमान चालिसा म्हटल्याने देशातील किती प्रश्न सुटले? आहेत. जर हनुमान चालिसा म्हटल्याने श्री सदस्य यांचा चेंगराचेंगरीत मृत्यू झाला, ते जिवंत होत असतील तर मीरोज सकाळ, संध्याकाळी, रात्री दिवसभरात हनुमान चालिसाम्हणत राहिल. जर हनुमान चालिसा म्हटल्याने समृद्धी महामार्गावर गेलेले २७ जीव परत येत असतील तर निश्चितच आम्ही सर्व हनुमान चालिसा म्हणायाला तयार आहोत. कुठली गोष्ट कुठे नेतायत. लोकप्रतिनिधी यांनी लोकांची प्रश्न मांडली पाहिजे, असे असतांना ते प्रश्नच मांडले जात नाही. पक्षाचे राजकारण सोडून द्या. प्रत्येकवेळी जाहिरातीसारखं बोलायची गरज नाही.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

घाटकोपर होर्डिंग प्रकरणी मोठी कारवाई, आयपीएस अधिकारी निलंबित

पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या सुटकेचे आदेश, जाणून घ्या आत्तापर्यंत काय काय घडलं?

अजित पवार गटाचे नेते आमच्या संपर्कात असल्याचा शरद पवार गटाचा दावा, शरद पवार म्हणाले-

भावाकडून बहिणीच्या प्रियकराच्या वडिलांची धारदार शस्त्राने हत्या,आरोपीला अटक

Prajwal Revanna: माजी खासदार प्रज्वल रेवन्ना यांच्यावर लैंगिक शोषण प्रकरणी आणखी एक एफआयआर दाखल

सर्व पहा

नवीन

लोकसभेत असदुद्दीन ओवेसी यांनी शपथ घेतल्यानंतर ओवेसींनी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या, संसदेत गदारोळ

मराठा आरक्षण : माझ्या समाजाचे नेते माझ्या सोबत नाही, मी एकटा लढत आहे -मनोज जरांगे पाटील

नागपूर, इंदूर-भोपाळ, जयपूर ते देशभरातील शहरांमध्ये FIITJEE सेंटर्स का बंद केली जात आहेत, काय आहे घोटाळा?

निलेश लंके यांनी घेतली इंग्रजीतून खासदारकीची शपथ

नागपूर विमानतळाच्या टॉयलेट मध्ये बॉम्बचा धमकीचा ईमेल

पुढील लेख
Show comments