Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

त्या भुखंडाशी माझा काही संबंध नाही…मीरा बोरवणकरांच्या आरोपात तथ्य नाही- अजित पवार

Webdunia
बुधवार, 18 ऑक्टोबर 2023 (08:45 IST)
येरवडा भुखंड प्रकरणाचा निर्णय तत्कालीन राज्य सरकारने घेतला होता. मीरा बोरवणकरांनी जे काय आरोप केले आहेत त्यात कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही. असा सांगताना माझा या प्रकरणाशी कोणताही संबंध नसून माझी कोणत्याही कागदपत्रावर सही नसल्याचे स्पष्टीकरण राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले आहे. तसेच एखादे पुस्तक प्रकाशित झाल्यावर प्रसिध्दीसाठी करण्यात येणाऱ्या युक्त्यांसारखा हा प्रकार वाटतो असाही टोला अजित पवार यांनी मीरा बोरवणकरांना लगावला आहे. माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन अजित पवारांवर गंभिर आरोप केले होते. मीरा बोरवणकरांच्या या आरोपांचे खंडन करण्यासाठी अजित पवार आज पत्रकार परिषदेत बोलत होते.
 
आपल्या पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार म्हणाले, “संबंधित प्रकरणी मी त्यावेळच्या अधिकारी मीरा बोरवणकर यांच्याशी चर्चा केली हे खर आहे पण तो निर्णय घ्यायला मी कोणताही दबाव टाकला नव्हता. पोलीस अधिकाऱ्यांनी जागा देण्यास नकार दिल्यावर मीही त्यावर पुन्हा चर्चा केली नाही.” असे अजित पवार यांनी सांगितले.
 
पुढे बोलताना ते म्हणाले, “जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करताना अनेक प्रश्न असतात. त्यामुळे ज्या त्या विभागाचे लोक पालकमंत्र्यांना आपल्या अडचणी सांगत असतात, त्यावेळी त्या गोष्टीचा आढावा घ्यावा लागतो. तत्कालिन सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार, मी येरवाडा भूखंडाविषयी मीरा बोरवणकर यांना विचारल्यावर त्यांनी भूखंड बिल्डरला देण्यास विरोध दर्शवला. त्यानंतर मी त्या भुखंडाशी संबंधित प्रकरणावरून कधीही त्यांना विचारले नाही.” असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले.
 
Edited By -  Ratnadeep ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हार्दिक पांड्याचा मोठा पराक्रम, आयसीसी क्रमवारीत मोठी झेप

आरोपी 28 वर्षे पोलिसांना चकवा देत होता, पोलिसांनी ताब्यात घेतले

आईला भेटण्यासाठी मुलगा थेट लंडनहून कार चालवत मुंबईत पोहोचला

पुण्यात झिका व्हायरसचे दोन रुग्ण आढळले

विधानसभा निवडणुकीपूर्वी तुतारी निवडणूक चिन्ह रद्द करण्याची शरद पवार गटाची निवडणूक आयोगाकडे मागणी

सर्व पहा

नवीन

आंदोलकांनी केनियाच्या संसदेला आग लावली,भारताने आपल्या नागरिकांसाठी एक ॲडव्हायजरी जारी केली

ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी, मोदी-राहुल गांधींनी सोबत जाऊन केलं अभिनंदन

अरविंद केजरीवाल यांना सीबीआयकडून अटक

इराणमध्ये नवीन राष्ट्राध्यक्षांच्या निवडीनंतर भारताबरोबरच्या संबंधांवर काय परिणाम होणार?

मुंबईतल्या कॉलेजमधील हिजाब बंदीच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास हायकोर्टाचा नकार

पुढील लेख
Show comments