Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आणखी चार महीने मिळाले असते तर छगन भुजबळ मुख्यमंत्री झाले असते

Webdunia
गुरूवार, 13 ऑक्टोबर 2022 (21:00 IST)
अजित पवार  यांनी आज राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ  यांच्या अमृत महोत्सव सोहळ्यात एक अनेकांच्या भुवया उंचवणारे विधान केले आहे. विशेष म्हणजे हे भाषण केले तेव्हा व्यासपीठावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार देखील उपस्थित होते. याशिवाय माजी उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होते. अजित पवार यांनी छगन भुजबळ यांना शुभेच्छा देत असतांना 1999 मध्ये आणखी चार महीने मिळाले असते तर छगन भुजबळ मुख्यमंत्री झाले असते असे विधान केले, मात्र अजित पवार इथेच थांबले नाही त्यांनी थेट शरद पवार यांच्या मनातील इच्छेबद्दल बोलून दाखविले आहे. अजित पवार यांनी म्हंटलंय आम्हालाही पवार साहेब पंतप्रधान म्हणून बसावे असं वाटत होते पण तसं झालं नाही, काही व्यक्तीच्या नशिबात योग नसतो असे म्हणताच सभागृहात अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
 
अजित पवारांच्या या विधानानंतर काही क्षणातच एकच हशा सभागृहात झाला. यावेळी अजित पवारांचे हे विधान संपताच शरद पवारांच्या उजव्या बाजूला बसलेल्या छगन भुजबळांनी हसत हसत डोक्यालाच हात लावला. तर शरद पवारांच्या डाव्या बाजूला बसलेल्या उद्धव ठाकरें हसू आवरेना अशी स्थिती झाली होती त्यावेळी त्यांनी तोंडासमोर हात आडवा धरून आपले हसू झाकण्याचा प्रयत्न केला.पण यावेळी शरद पवारांनी कुठलेही हावभाव न करता हातातील रुमालाने चेहरा पुसला आणि आपल्या बद्दल कुणी काही बोललंच नाही असे दाखवण्याचा प्रयत्न केला.
 
दरम्यान, छगन भुजबळ यांचीही मुख्यमंत्री होण्याची इच्छा काही लपून राहिलेली नाही, हीच संधी साधत उद्धव ठाकरेंनी देखील भुजबळांना चिमटा काढत शिवसेना सोडली नसती तर मुख्यमंत्री कधीच झाला असता असे म्हंटले आहे.

Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

असे काम क्वचितच कोणत्याही पंतप्रधानांनी केले असेल- मल्लिकार्जुन खर्गे

आसाममधील सिलचर येथील एका संस्थेत भीषण आग,अनेक मुले अडकली

पुढील लेख
Show comments