Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लढाई संपली नाही तर आता खरी लढाई मुंबईत होणार आहे : फडणवीस

Webdunia
शुक्रवार, 11 मार्च 2022 (15:37 IST)
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गोवा विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला सत्तेत आणल्यानंतर मुंबई भाजप कार्यालयात त्यांचे  जंगी स्वागत करण्यात आले आहे. गोव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास दाखवून मतदारांनी मत दिलं आहे. गोव्यात भाजपची एकहाती सत्ता आली परंतु हा विजय साजरा केल्यानंतर आता मुंबईसाठी सज्ज व्हायचे आहे. लढाई संपली नाही तर आता खरी लढाई मुंबईत होणार आहे. असा इशारा फडणवीसांनी शिवसेनेला दिला आहे. यावेळी फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला. 
 
कुठल्याच लढाईने होरपळून जायचे नाही. कुठलाही विजय डोक्यात घालायचा नाही. विजयाने नम्र व्हायचे विजयाने अधिक मेहनत करायची. खरी लढाई आता मुंबईत व्हायची आहे. मुंबईला कुठल्या पार्टीपासून मुक्त करायचे नाही तर मुंबईला भ्रष्टाचारातून मुक्त करायचे आहे. आम्ही कुठल्या पार्टीच्या विरोधात नाही तर आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे. त्यासाठी आम्ही मैदानात उतरलो आहे. जोपर्यंत मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून बाहेर काढत नाही. तोपर्यंत दम घेता येणार नाही. म्हणून हा विजय आज साजरा करा आणि उद्यापासून कामाला लागा आणि पुन्हा एकदा मुंबईचा प्रचंड विजय या महाराष्ट्रामध्ये भाजपचे पूर्ण बहुमताचे सरकार तयार करण्यासाठी आपण सगळ्यांनी सज्ज राहावे ही आपल्या सर्वांना विनंती करतो.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

17 february आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके पुण्यतिथी विशेष

कुर्ला परिसरात 5 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार, दोन अल्पवयीन मुलांना अटक

LIVE: राज्यातील एकही मराठी शाळा बंद होणार नाही-देवेंद्र फडणवीस

राज्यातील एकही मराठी शाळा बंद होणार नाही, फडणवीसांनी दिले आश्वासन

मुंबईत बस ने प्रवास करणे पुन्हा महागणार, बेस्ट बसचे भाडे वाढणार!

पुढील लेख
Show comments