Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सरकार थंड असेल तर आता आम्हीच बंड करू, चित्रा वाघ यांचा सरकारला इशारा!

Webdunia
शुक्रवार, 14 जानेवारी 2022 (14:49 IST)
वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील कदम हॉस्पिटल परिसरात ११ कवट्या आणि ५२ हाडे सापडली आहेत. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. राज्यात अजूनही अपहरण करणारी टोळी धुमाकूळ घालत असून, आता अल्पवयीन मुलींच्या अवैध गर्भपाताचे प्रकरण उघडकीस आले आहे. चिमुकल्या जीवांशी खेळण्याची ३०-३० हजारांत सौदेबाजी चालली आहे. यावरून आता भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. राज्य सरकार असेल थंड तर आता आम्हीच पुकारू बंड, असा चित्रा वाघ यांनी इशारा दिला आहे.
 
वर्ध्यातील आर्वी येथे एक अतिशय धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे. ती गरोदर राहिली आणि आरोपीने तिला गर्भपातासाठी नेले. ३० हजार रुपयांचा व्यवहार झाल्याचे ११ जानेवारीला कळले. आर्वी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली असता परिसरात काही कवट्या, हाडे व गर्भ आढळून आल्याने त्यांना धक्काच बसला. तेथे किती अवैध गर्भपात झाले? किती मुले मारली गेली? किती चिमुकल्यांची हत्या झाली? ते सांगता येत नाही, असे सांगत वाघ यांनी संताप व्यक्त केला आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments