Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रस्ते खराब असतील तर टोल टॅक्स घेणे चुकीचे, लोक तर भडकतीलच- नितिन गडकरी

Webdunia
बुधवार, 26 जून 2024 (11:54 IST)
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी खराब रस्त्यांवर टोल वसुलीवर नाराजी व्यक्त केली. त्यांचे म्हणणे आहे की, जर चांगला रस्ता आणि सेवा पुरवली जात नसेल तर तोल घेणे चुकीचे आहे. एका कार्यक्रम दरम्यान त्यांनी टोल प्लाझावर लागणाऱ्या टॅक्स वर चिंता व्यक्त केली. माहिती मिळाली आहे की, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण म्हणजे NHAI नवीन व्यवस्था अंतर्गत टोल गेट काधनून टाकण्याची तयारी करीत आहे. 
 
सॅटेलाईट बेस्ट टोलिंग वर आयोजित वर्कशॉप मध्ये सहभागी झालेले गडकरींनी टोलटॅक्सवर मनमोकळेपणाने चर्चा केली. ते म्हणाले की, 'जर तुम्ही चांगली सेवा देऊ शकत नसाल तर टोल चार्ज करायला नको, आपण युजर्स फी घेणे आपल्या हिताची रक्षा करणे यामुळे टोलिंग करण्याकरिता घाईत असतो. जेव्हा एखाद्या रस्त्याची स्थिती चांगली नसते तेव्हा माझ्याजवळ तक्रारी येतात.'
 
तसेच ते म्हणाले की, जिथे तुम्ही चांगल्या प्रकारचे रस्ते बनावत आहात तिथे तुम्ही युजर फी घ्यावी. जर तुम्ही खराब रस्ते असतांना टोल घेत असाल तर तुम्हाला लोकांचा नाराजीचा सामना करावा लागेल. 
 
तसेच गडकरी म्हणाले की, वैश्विक नेविगेशन उपग्रह प्रणाली वर आधारित इलेक्ट्रिनिक्स टोल संग्रह लागू झाल्यावर देशामध्ये एकूण टोल संग्रह कमीतकमी 10,000 करोड रुपये पर्यंत वाढेल. भारतामध्ये एकूण टोल  संग्रह वर्षाला आधारावर 35  प्रतिशत वाढून वित्त वर्ष 2023-24 मध्ये 64,809.86 करोड पर्यंत पोहचला होता. या महिन्याच्या सुरवातीला एनएचएआई ने राष्ट्रीय राजमार्गांवर उपग्रह आधारित इलेक्ट्रॉनिक्स टोल संग्रहच्या कार्यान्वयसाठी जगभरात रुचीपत्र आमंत्रित केले गेले होते. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का, साळवी यांच्यानंतर जितेंद्र जनावळेंचा राजीनामा

LIVE: रणबीर इलाहाबादियाला फटकारल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला

Maharashtra Political Crisis: मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिंदे गटातील २० आमदारांची सुरक्षा काढून घेतली

मनू भाकरने बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर पुरस्कार जिंकला

नवी मुंबईत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी जोडप्याला त्यांच्या मुलासह अटक

पुढील लेख
Show comments