Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

इगतपुरी – जमिनीच्या वादातून जमावाकडून 20 वर्षीय युवतीची हत्या; तीन घरेही जाळली

Webdunia
शनिवार, 11 जून 2022 (15:27 IST)
तालुक्यातील अधरवड येथे जमिनीच्या वादातून जमावाकडून २० वर्षीय युवतीची हत्या करुन तीन घरे जाळण्यात आली आहे. कातकरी कुटुंबियांची ही घरे होती. हा जमाव इगतपुरी तालुक्यातील बारशिंगवे येथील असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. शुक्रवारीच हा संतप्त जमाव कातकरी वस्तीवर चाल करून आला होता. पण, पोलिसांनी हा वाद मिटवला. पण, पहाटेच्या सुमारास कातकरी वस्तीवर जमाव आला. त्यांनी या मुलीची हत्या करुन तीन घरे जाळली. सुरुवातीला या जमावाने शरद वाघ यांना मारहाण केली. ही मारहाण सुरु असतांना त्यांची मेहुणी लक्ष्मी (20 ) ही भांडण सोडण्यासाठी आली. पण, संतप्त जमावाने तीला मारहाण केली. त्यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला. या सर्व घटनेनंतर घोटी पोलिसांनी वेगाने तपास सुरु केला आहे. 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments