Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नवरा-बायको, सख्खे भाऊ आणि बाप-लेक, पाण्यात बुडून सहा जणांचा मृत्यू

Webdunia
बुधवार, 6 ऑक्टोबर 2021 (09:38 IST)
अहमदनगर जिल्ह्यात एकाच दिवशी  पाण्यात बुडून तीन वेगवेगळ्या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यात पती-पत्नी, बाप-लेक आणि सख्ख्या भावांचा यामध्ये समावेश आहे.
 
एकाच दिवशी पाण्यात बुडून सहा जणांचा मृत्यू झाल्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या सहापैकी दोघा जणांचे मृतदेह सापडले आहेत. चौघांचा शोध सुरु आहे. 
 
कुठे काय घडलं
श्रीरामपूर तालुक्यातील माळेवाडी येथे मासेमारी ‌करणाऱ्या दाम्पत्याचा ओढ्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाला. दुसरीकडे, कोपरगाव तालुक्यातील मुर्शदपूरजवळील गांजावाडी येथील नाल्यात बुडून बाप-लेकाचा जीव गेला. तर राहुरीजवळील गणपती घाट येथे मुळा नदी पात्रात बुडाल्यामुळे दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला.
 
एका दिवसापूर्वीच नाशिक जिल्ह्यात वेगवेगळय़ा ठिकाणी पाण्यात बुडून दोन जणांचा मृत्यू झाला. बीड तालुक्यातील समर्थ छानवाळ (१४) हा येवला तालुक्यातील वडगाव गावातील नदीपात्रात कुटुंबासह कपडे धुण्यासाठी गेला होता तेव्हा पाण्यात खेळत असताना बुडाला. 
 
दुसऱ्या घटनेत सुनील कोर (३७) हा अंबासन गावातील युवक मोसम नदीत गेला असता त्याला अचानक फीट आली. तो मोसम नदीच्या पात्रातील खड्डय़ात पडल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. 

संबंधित माहिती

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

पुढील लेख
Show comments