rashifal-2026

‘राजाराम’कारखान्याच्या निवडणुकीत पाटील गटाच्या 29 उमेदवारांचे अर्ज छानणीमध्ये अवैध!

Webdunia
शुक्रवार, 31 मार्च 2023 (08:33 IST)
आमदार सतेज पाटील गटाच्या 29 उमेदवारांचे अर्ज छानणीमध्ये अवैद्य ठरले आहेत. साखर कारखान्याच्या नियमानुसार कारखान्यास ऊस न घातल्याचा ठपका ठेवून हे अर्ज बाद करण्यात आले आहेत. या निर्णयानंतर आमदार सतेज पाटील यांनी नाराजी व्यक्त करून या निर्णयामुळे आजचा दिवस हा सहकारातील काळा दिवस ठरला असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
 
कोल्हापूर जिल्ह्याचे आमदार सतेज पाटील गट आणि महाडिक गट राजकारण विभागले आहे. जिल्ह्यातील प्रत्येक निवडणूकीमध्ये या दोन गटांमुळे चुरस निर्माण होत असते. राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये ही लढत रंगतदार होण्याची चिन्हे असतानाच आमदार सतेज पाटील गटाला मोठा धक्का बसला आहे.
 
पाटील गटाच्या 29 उमेदवारांचे अर्ज छानणीमध्ये अवैध ठरले आहेत. साखर कारखान्याच्या नियमानुसार कारखान्यास ऊस न घातल्याचा ठपका ठेवून हे अर्ज बोद करण्यात आले आहेत. छानणीनंतर या निर्णयाविरोधात आपण न्यायालयात दाद मागणार असल्याचे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

२१ नोव्हेंबरपासून मार्गशीर्ष महिना सुरु, श्री गुरुदेव दत्तांची भक्ती आणि महालक्ष्मीची कृपादृष्टीचा काळ

Wedding Wishes In Marathi नवीन लग्नाच्या शुभेच्छा मराठी

एनआयटी नागपूरने रिक्त जागा जाहीर केल्या ,शिक्षकेतर पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

फक्त 10 मिनिटांत बनवा हे घरगुती केसांचे तेल, केस गळणे थांबेल

हिवाळ्यात आरोग्याची काळजी घेण्यासाठी या 5 गोष्टी खा

सर्व पहा

नवीन

Bihar CM Nitish Kumar नितीश कुमार दहाव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री बनले

जितेंद्र आव्हाडांसमोर त्यांच्याच नेत्याने "पाकिस्तान जिंदाबाद" असे नारे दिले, एफआयआर दाखल

पुणे जमीन घोटाळ्यात दमानिया यांचा मोठा दावा, अजित पवारांचा राजीनामा मागितला

वसई-विरारमध्ये पाणी भरण्यावरून दोन शेजाऱ्यांमध्ये वाद: महिलेने डास प्रतिबंधक स्प्रे फवारल्याने व्यक्तीचा मृत्यू

LIVE: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली

पुढील लेख
Show comments