Festival Posters

दोघा पवारांमध्ये ट्वीटर वार अजित पवार यांना दिले शरद पवार यांनी हे उत्तर

Webdunia
सोमवार, 25 नोव्हेंबर 2019 (09:46 IST)
काका पुतण्या वाद काही महाराष्ट्रात नवीन नाही. आता तो वाद पवार यांच्या घरात सुरु झाला आहे. यामध्ये अजित पवार यांनी माध्यमातून व्यक्त होणे टाळले मात्र त्यांनी सोशल मिडीयावर आपले मत व्यक्त केले आहे. या उत्तरला शरद पवार यांनी सुद्धा उत्तर दिले आहे. त्यामुळे आता दोघा पवारांमध्ये ट्वीटर वार सुरु झाले आहे.
 
अजित पवार म्हणाले की मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहे आणि कायम राष्ट्रवादीमध्येच राहीन. शरद पवार साहेब आमचे नेते आहेत. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस मिळून लोकांच्या कल्याणासाठी महाराष्ट्रात स्थिर सरकार देतील, असं ट्वीट त्यांनी केले आहे.
 
अजित पवारांच्या या ट्वीटमुळं अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र अजित पवारांच्या  ट्वीटला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी जोरदार सडेतोड  उत्तर दिले  आहे.
 
काय म्हणाले शरद पवार?
"भाजपसोबत सरकार स्थापन करण्याचा प्रश्नच नाही. शिवसेना, काँग्रेससोबत सरकार स्थापन करण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसनं एकमतानं घेतला आहे. अजित पवारांचे विधान खोटे, दिशाभूल करणारे आणि खोडसाळ असून समाजात चुकीचा समज पसरविणारे आहे." असं शरद पवार यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
 
अजित पवार परतणार नाहीत 
राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर काही शांत असलेल्या अजित पवार यांनी मौन सोडले आहे. अजित पवार हे पहिल्यादांच ट्विटवर सक्रिय दिसून आले आहेत. त्यांनी उपमुख्यमंत्री झाले त्या बद्दल सर्वांचे आभार मानले आहे,  यातून त्यांनी आपण निर्णयावर ठाम असून, त्यावरून माघार घेणार नसल्याचे संकेत अप्रत्यक्षरित्या दिले आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कुंभ राशीत शुक्राचे आगमन, या ५ राशींचे नशीब पालटणार, संपत्ती आणि रोमान्सचे योग!

हृदयविकाराच्या या सुरुवातीच्या लक्षणांबद्दल प्रत्येक व्यक्तीला माहिती असायला हवी

Essay on Growing Population वाढती लोकसंख्या: एक गंभीर समस्या

विंड चाइम वाऱ्याच्या आवाजातून शांत आणि सकारात्मक वातावरण निर्माण करतात

अर्ध नारीश्वर अष्टकम Ardhanareeswara Ashtakam

सर्व पहा

नवीन

मुंबईतील दहिसर मध्ये दीड वर्षाच्या मुलीवर बलात्कार; तरुणाला अटक

LIVE: मुलुंड मेट्रो अपघातावर एकनाथ शिंदे संतापले, अभियंता निलंबित

नाशिकमधील उद्योजकाचा परिक्रमा पूर्ण केल्यानंतर गुजरातमध्ये नर्मदा नदीत बुडून मृत्यू

होळीला घरी जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मुंबई वरून वाराणसी आणि गोरखपूरकरिता विशेष गाड्यांची घोषणा

पंतप्रधान मोदी यांनी इंडिया एआय इम्पॅक्ट समिटमध्ये जिओ पवेलियनला भेट दिली

पुढील लेख
Show comments