rashifal-2026

डिसेंबर २०२३ पासून चार टप्प्यात समृद्धी महामार्गाचे लोकार्पण

Webdunia
गुरूवार, 8 डिसेंबर 2022 (22:01 IST)
नागपूर ते शिर्डी टप्पा पूर्ण झाल्यानंतर नागपूर ते सिन्नर असा ५६५ किमीचा महामार्ग फेब्रुवारीअखेरीस तर नागपूर ते भरवीर जंक्शन (सिन्नर-घोटी रस्ता) असा ६०० किमीचा टप्पा मार्चअखेरीस पूर्ण होईल. तसेच नागपूर ते इगतपुरी असा ६२३ किमीचा टप्पा मे अखेरीस पूर्ण करून वाहतूक सेवेत दाखल करण्यात येणार असल्याची माहिती एमएसआरडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी ‘लोकसत्ता’ दिली. इगतपुरीपर्यंतचा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर उर्वरित ७८ किमीचा टप्पा पूर्ण होण्यासाठी मात्र मे पासून पुढे सहा महिने लागणार आहेत. या टप्प्यात खर्डी येथे दोन किमीचा एक पूल असून तो अत्यंत आव्हानात्मक आहे. या पूलाचे खांब तब्बल ७४ मीटर उंच असणार असून एक टप्पा १४० मीटरचा आहे. हे काम पूर्ण करण्यास जास्त कालावधी लागणार आहे. त्यामुळे नागपूर ते ठाणे (मुंबई) असा ७०१ किमीचा टप्पा डिसेंबर २०२३ अखेरीस पूर्ण होईल असेही गायकवाड यांनी सांगितले. नागपूर येथून सुरू झालेला हा महामार्ग ठाण्यातील आमाणे गावात (शांगरीला रिसॉर्टपासून सहा किमी दूर) येथून येऊन संपणार आहे. त्यानुसार प्रवाशांना डिसेंबर २०२३ पासून ताशी १२० किमी वेगाने आठ तासात प्रवास करता येणार आहे.
 
लोकार्पणाचे चार टप्पे असे
टप्पा-अंतर (किमी)-लोकार्पण कधी
नागपूर ते शिर्डी-५२० किमी-११ डिसेंबर २०२२
नागपूर ते सिन्नर-५६५ किमी-फेब्रुवारी २०२३
नागपूर ते भरवीर जंक्शन-६००किमी-मार्च २०२३
नागपूर ते ठाणे (मुंबई)-७०१ किमी-डिसेंबर २०२३
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Mithun Varshik Rashi Bhavishya 2026 in Marathi मिथुन राशी २०२६ राशीभविष्य

काळा रंग अशुभ मानतात मग मंगळसूत्रांमध्ये काळे मणी का असतात? ज्योतिषशास्त्रीय महत्त्व काय?

Nanad Bhavjay Relationship नणंद- वहिनी यांच्यातील नाते कमकुवत करतात या चुका

पूजेत उदबत्ती जाळणे अशुभ ? शास्त्र काय म्हणतात ते जाणून घ्या

Datta Jayanti 2025 दत्त जयंती कधी? दत्ताचा जन्मोत्सव साजरा करण्याची पद्धत आणि महत्त्व जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्र आरोग्य विभागाने 'नाईट स्क्वॉड' सुरू केले

सोलापूर: स्वच्छतेच्या मुद्द्यांवरून बस स्टँड डेपो मॅनेजर निलंबित

बिहारमध्ये मायावतींच्या पक्षाला मोठा धक्का, बसपाच्या प्रदेशाध्यक्षांनी पदाचा राजीनामा दिला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बदलापूरमध्ये अनेक विकास प्रकल्पांची घोषणा केली

नितीन गडकरी म्हणाले-दिल्ली ते मुंबई एक्सप्रेसवेचा प्रवास फक्त १२ तासांचा असेल

पुढील लेख
Show comments