Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

धरणातील पाणीसाठा वाढला, जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत ५८ टक्के पाऊस

Webdunia
गुरूवार, 2 सप्टेंबर 2021 (16:07 IST)
जळगाव जिल्ह्यात मागील गेल्या २ ते ३ दिवसापासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश धरणांमधील जलसाठ्यात वाढ झालीय. गेल्या आठवडाभरात धरणातील पाणीसाठयात ४ ते ६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत ३० टक्के कमीच पाणीसाठा असल्याने अजूनही दमदार पावसाची प्रतिक्षा शेतकऱ्यांसह सर्वांनाच आहे.
 
यंदा सरासरी पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने दिला होता. परंतु राज्यातील काही भागात पावसाने दमदार हजेरी लावली असली जळगाव जिल्ह्यात मात्र, पावसाने चांगलीच ओढ दिल्याचे दिसून आलेय. जून-जुलैत पावसाने ओढ दिल्यानंतर ऑगस्टमध्ये दमदार पाऊस कोसळेल अशी अपेक्षा जिल्हावासीयांना होती. परंतु ऑगस्ट महिन्याच्या शेवटी दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे. चाळीसगाव, भडगाव आणि पाचोरा या तीन तालुक्यांना अतिवृष्टीचा जोरदार फटका बसला.
 
जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ५८ टक्के पाऊस झाला आहे. तर धरणातील पाणीसाठयात गतवर्षीच्या तुलनेत ३० टक्के कमी जलसाठा झाला आहे. आगामी काळात पाऊस न पडल्यास उन्हाळ्यात पाणी टंचाई तीव्र स्वरूपाची जाणवेल असा अंदाज भुगर्भतज्ञ व्यक्त करीत आहेत.
 
जिल्ह्यात धरणातील पाणीसाठा असा
धरण–२६ ऑगस्ट २०२१– १ सप्टेंबर २०२१ -गतवर्षीचा साठा (२०२०)
हतनूर–३५.०६–४१.३७ –३९ टक्के
गिरणा–४४.५९–४५.९३–७६
वाघूर–६१.८१–६२.६६–९९.३०
अभोरा–१००–१००–१००
मंगरूळ-१००–१००–१००
सुकी–९२.८९—९५.०७–१००
मोर–५५.४०–५६३–७२.५९
अग्नावती–११.२०–५८.२९—१००
हिवरा–५०.०९—-१००–१००
बहुळा–२०.१३–२७.७५—९४.४४
तोंडापूर–४४.७७–४६.७२–१००
अंजनी–२९.०३–३७.५४–८३.७३
भोकरबारी–१३.४०–१३.२६–९६.५८
गुळ–२९.५९–३१.२०–७७.१४
बोरी–१००–१००–९६.५८
मन्याड–१००–१००–१००
 
एकूण—८१.६५–८८.६२–९९.९७

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments