Marathi Biodata Maker

येत्या 4-5 दिवस पाऊस झोडपणार

Webdunia
शनिवार, 11 सप्टेंबर 2021 (21:51 IST)
येणारे हे 4 -5 दिवस महत्वाचे आहे.हवामान खात्यानं मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र वाढल्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. हवामान विभागाने पुढच्या पाच दिवसात काही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. 11 सप्टेंबर रोजी रायगड,रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. 
 
तर 12 सप्टेंबर रोजी ठाणे, रायगड, रत्नागिरी,सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, नंदुरबार, धुळे, जळगाव, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.तर कोकण आणि घाटमाथ्यावर पाऊस वाढण्याची शक्यता असून,12 आणि 13 सप्टेंबर रोजी पावसाचा प्रभाव वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मुंबई, ठाण्यासह संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात शनिवारपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.वसई-विरार महानगरपालिका आणि पालघर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केले आहे. आयएमडीनुसार येत्या 5 दिवसात मध्य महाराष्ट्र, कोकण, गुजरात राज्यात मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता आहे. बुधवारी देखील, मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रातील अनेक भागात पूरस्थिती कायम आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

सर्व पहा

नवीन

LIVE: ठाकरे बंधूंचे आव्हान: मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचे षड्यंत्र

१० मुलींनंतर मुलगा झाला... १९ वर्षांत ११ व्यांदा आई बनली

ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचे पुण्यात निधन

ट्रम्प भारतावर ५०० टक्के कर लादणार! रशियाचे तेल चीन आणि ब्राझीललाही महागात पडेल

IND vs NZ T20: नागपूरमध्ये सामन्याच्या दिवशी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत मेट्रो धावेल; एसटी बसेस देखील उपलब्ध असतील

पुढील लेख
Show comments