Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जायकवाडी धरण लवकरच गाठणार ५० टक्क्यांची पातळी

Webdunia
गुरूवार, 14 जुलै 2022 (08:15 IST)
मागील काही दिवसांपासून सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला मोठा पूर आला आहे. सोबतच गोदावरीच्या उपनद्याही दुथड्या भरून वाहू लागल्या आहेत. याचाच परिणाम आतापर्यंत जायकवाडी धरण तब्बल ४३ टक्के भरले आहे. अशीच स्थिती राहिली तर पुढील काही तासांतच हे धरण ५० टक्क्यांच्या टप्पा ही गाठेल.
 
नाशिक जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. सध्या पावसाचा जोर कमी झाला असला तरी पावसाची संततधार सुरूच आहे. नागरिक पावसाने बेजार झाले आहेत. मागील ४ दिवसांच्या मुसळधार पावसामुळे नांदूरमधमेश्वर धारणातून ८० हजार क्यूसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. पण आता पाऊसाचा जोर काही प्रमाणात कमी झाल्याने ५८,६९७ क्यूसेकने विसर्ग सुरू आहे. धरणातून हा विसर्ग सुरू असल्याने मागील चोवीस तासांत जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात तब्बल साडे सहा टक्क्यांची वाढ झालेली आहे. नाशिक जिल्ह्यातुन गंगापूर धरणातून ७,१२८ क्यूसेकने विसर्ग सुरू आहे. दारणामधून ८,८४६ क्यूसेकने विसर्ग सुरू आहे. कावडमधून २,५९२ तर होळकर ब्रीजमरधून ८,१५० आणि आळंदी वरून २४३ क्यूसेकने विसर्ग सुरूच आहे. त्यामुळे आता पर्यंत जायकवाडी धरणात गेल्या २४ तासांमध्ये १२४ दलघमी पाण्याची आवक झालेली आहे. म्हणजेच मागील २४ तासांत ४.७३ टीएमसी पाण्याची आवक झालेली आहे. त्यामुळे जायकवाडी धरणाची पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. अशीच स्थिती राहिल्यात पुढील काही तासांतच जायकवाडी ५० टक्के भरणार असल्याची शक्यता आहे.

संबंधित माहिती

असे काम क्वचितच कोणत्याही पंतप्रधानांनी केले असेल- मल्लिकार्जुन खर्गे

आसाममधील सिलचर येथील एका संस्थेत भीषण आग,अनेक मुले अडकली

प्रामाणिकपणा ! मुंबईत सफाई कामगाराला रस्त्यावर 150 ग्रॅम सोनं सापडलं, पोलिसांच्या ताब्यात‍ दिले

CSK vs RCB : सीएसके आणि आरसीबी प्लेऑफसाठी शेवटच्या प्रयत्नात,करो या मरोचा सामना

प्राचार्यांनी आयुषला गटारात फेकले, त्याला दुखापत झाली तर रक्त पाहून घाबरले; आई आणि मुलाला अटक

INDIA युतीने ठरवले आहे PM कँडिडेटचे नाव, उद्धव ठाकरे यांचा मोठा दावा

उत्तर प्रदेशमध्ये 5 वार्षांच्या चिमुकल्याची हत्या

सुकमा एन्काऊंटर: पोलीस आणि नक्षलवादींमध्ये लढाई, गोळीबारामध्ये 1 माओवादी ठार

महाराष्ट्रात एका कपलने आवासीय योजनेच्या नावाखाली 1.48 कोटी रुपये लुटले

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकतंत्र संपुष्टात आणता आहेत- अरविंद केजरीवाल

पुढील लेख
Show comments