Marathi Biodata Maker

वारंवार पुरवणी मागण्या मांडून सरकार जनतेची दिशाभूल करत आहे – जयंत पाटील

Webdunia
सोमवार, 19 नोव्हेंबर 2018 (17:22 IST)
वारंवार पुरवणी मागण्या मांडून सरकार जनतेची दिशाभूल करत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते जयंत पाटील यांनी केला आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आजही सरकारने २० हजार कोटींच्यावर पुरवणी मागण्या मांडल्या आहेत. यापूर्वी मांडलेल्या पुरवणी मागण्यांचा विनियोग सरकारने केलेला नसतानाही पुन्हा नवीन पुरवणी मागण्या मांडल्या जात आहेत, असे पाटील यांनी स्पष्ट केले. सरकारने आधीच अनेक विभागांच्या खर्चाला कात्री लावली आहे. त्यामुळे सरकारने आतापर्यंत मंजूर झालेल्या पुरवणी मागण्यांचा खर्च सभागृहात मांडावा, अशी मागणी पाटील यांनी आज विधानभवनाबाहेर माध्यम प्रतिनिधींशी बोलताना केली.
 
विधान परिषदेत शोकप्रस्तावावर बोलताना आ. हेमंत टकले यांनी माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी, कॉ. माधवराव गायकवाड, उमेशाताई पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली. अटलजींच्या जनसंघातील कामगिरीचा तसेच पंतप्रधापदी असताना त्यांनी केलेल्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेत टकल यांनी त्यांना अभिवादन केले.
 
कॉ. माधवराव गायकवाड यांना श्रद्धांजली वाहताना ते म्हणाले की, गायकवाड यांची कारकीर्द ही मनमाड विभागात मोठ्या प्रमाणावर झाली. पहिले विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी काम केले. त्यांचा सगळ्यात मोठा लढा हा शेतकाऱ्यांसाठी होता. परंतू अशा सामान्यांच्या प्रत्येक गोष्टीत लक्ष घालणाऱ्या नेत्याला मृत्यूनंतर देखील न्याय मिळत नाही, ही खंत व्यक्त करतानाच माधवराव गायकवाड यांच्या नावाने गरीब विद्यार्थ्यासाठी शिष्यवृत्ती सुरू करण्याची मागणी टकले यांनी केली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

LIVE: रोहित पवार यांची बागेश्वर बाबांवर टीका

रोहित पवार यांची बागेश्वर बाबांवर टीका, स्वतःचे मुलं जन्माला घाला

धावत्या ट्रेनच्या स्लीपर कोचला अचानक आग, प्रवाशांनी ट्रेनमधून उड्या घेतल्या

दिल्लीच्या आयजीआय विमानतळावर स्विस एअरच्या विमानाला उड्डाण करताना तांत्रिक बिघाड, मोठा विमान अपघात टळला

KKR vs LSG : गुणतालिकेत तळाशी असलेल्या कोलकाता आणि लखनौ या दोन संघांसाठी हा 'करा किंवा मरा' सामना आहे

पुढील लेख
Show comments