suvichar

भाजपला माहिती आहे की बारामतीत आपण जिंकू शकत नाही, असा दावा जयंत पाटील यांनी केला

Webdunia
शुक्रवार, 23 सप्टेंबर 2022 (09:18 IST)
शिंदे सरकार अस्थिर आहे. नवीन सरकार स्थापन होऊन आता इतके दिवस झाले, तरी अद्याप मंत्रिमंडळ विस्तार होत नाही. बारामतीमध्ये येऊन भाजपला छुप्या पद्धतीने विकास बघायचा आहे. भाजपला माहिती आहे की बारामतीत आपण जिंकू शकत नाही, असा दावा जयंत पाटील यांनी केला. तसेच भाजपच्या नेत्या बारामती दौऱ्यावर आलेल्या आहेत. जीएसटीबद्दल त्यांना प्रश्न विचारायची संधी दिली आहे, त्यांना जनता विचारेल आता, असे सांगत निर्मला सीतारामन यांच्या दौऱ्यावर जयंत पाटील यांनी टीका केली.
 
शिंदे गटातील आमदार म्हणतात, कुठून अवदसा आठवली या नादाला लागलो
शिंदे गटातील आमदार खासगीत बोलताना सांगतात की, कुठून अवदसा आठवली या नादाला लागलो, असा टोला लगावताना, भाजपला आपल्या संख्याबळाची कायम भीती लागून राहिलेली आहे. आधी १२३ आमदार निवडून आले होते. मागच्या निवडणुकीत ती संख्या घटून १०५ वर आली आणि आता जे काही केले आहे, त्यामुळे जनता नाराज आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत तीच संख्या ८० ते ८५ पर्यंत खाली येते की काय, अशी भीती भाजपला सतावतेय, अशी टीका जयंत पाटील यांनी केली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

पुण्यात २२ दिवसांत १२३ मुली आणि महिला बेपत्ता; सोशल मीडिया ठरतोय तरुणींसाठी मोठा सापळा

पुणे पोर्श प्रकरणातील आरोपी तुरुंगातून सुटल्यानंतर जल्लोषाचा व्हिडिओ व्हायरल

ज्येष्ठ नेते शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी रजा सवलती संदर्भात राज्य शासनाचा मोठा निर्णय

गोंदियामध्ये महिलांसाठी पीसीओडी क्लिनिक सुरू, दर बुधवारी मोफत तपासणीची सुविधा उपलब्ध

पुढील लेख
Show comments