suvichar

जि.प.साठी २ हजार ६४२ मतदान केंद्रे

Webdunia
गुरूवार, 9 फेब्रुवारी 2017 (08:42 IST)
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी आयोगाने २ हजार ६४२ मतदान केंद्रे निश्‍चित केली आहेत. एका केंद्रावर ५०० ते १४०० मतदारांना मतदान करता येणार आहे. एका केंद्रावर एक अधिकारी, दोन सहाय्यक अधिकारी, एक शिपाई अशी मनुष्यबळाची उपाययोजना निवडणूक विभागाने केली आहे. सुमारे १७ हजार कर्मचारी यात गुंतवून जाणार आहेत.
 
एका बाजूला निवडणुकीची प्रक्रिया करताना निवडणूक विभागाने दुसर्‍या बाजूला मतदानाची केंद्रे १५ तालुक्यांमध्ये सज्ज करण्यास सुरुवात केलेली आहे. जर एका केंद्रांवर ५०० पेक्षा अधिक मतदारांचे मतदान होणार असेल अशा केंद्रांवर पाच कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
 
सर्वाधिक ३४१ मतदान केंद्रे निफाड तालुक्यात आहेत. तर पेठ तालुक्यात  ८३ मतदान केंद्रांवर मतदान होईल. निवडणूक कामासाठी निवडणूक विभागाने जिल्हा परिषद, मनपा आणि शैक्षणिक संस्थांचे कर्मचारी नमूद केलेले आहेत. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात सुमारे १३ हजार शिक्षक आहेत.
 
त्याखालोखाल आरोग्य विभागाच्या कर्मचार्‍यांची संख्या आहे. मात्र आरोग्य विभागाच्या कर्मचार्‍यांपेक्षा शिक्षण विभागाचे कर्मचारी जास्त प्रमाणात निवडणूक कामासाठी उपयोगात आणले जाणार आहेत. त्याचबरोबर खासगी शाळांच्या शिक्षकांनाही निवडणूक कामासाठी मदतीला घेतले जाणार आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मास कधीपर्यंत असेल? या पवित्र महिन्यात या ५ शुभ गोष्टी केल्यास तुमचे भाग्य उजळेल

देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करता येतो का? जाणून घ्या शास्त्रानुसार याचे नियम

Career in BSc in Respiratory Therapy : बीएससी इन रेस्पिरेटरी थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

त्वचेसाठी तुरटीचे हे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

महागड्या स्प्रेपेक्षा घरगुती उपाय जास्त प्रभावी; आरसे स्वच्छ करण्याची योग्य आणि सोपी पद्धत येथे पहा

सर्व पहा

नवीन

मुंबई झोपडपट्टीमुक्त होईल, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी 'झोपडपट्टी समूह पुनर्विकास योजने'वर भर देत घोषित केले

नक्षलमुक्त भारत: गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत दावा केला आहे की, भारतातून नक्षलवाद समूळ नष्ट झाला

LIVE: पुढील ४८ तासांत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा येलो अर्लट जारी

कुख्यात दहशतवाद्यासह नऊ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले; आंध्र प्रदेशातील नक्षलवाद संपुष्टात आला

राजा रघुवंशी हत्याकांड : कुटुंब म्हणाले आमचा मुलगा परत आला; राजा रघुवंशीच्या मृत्यूनंतर बाळाचा जन्म

पुढील लेख
Show comments