Dharma Sangrah

राज्यपालांच्या अभिभाषणावर विरोधी पक्षांचा बहिष्कार

Webdunia
राज्यपाल विद्यासागर राव विधान भवनात पोहोचताच विरोधी पक्षांनी जोरदार घोषणाबाजी केली. महात्मा गांधींच्या पुतळ्यावर गोळ्या झाडण्यात आल्या, तेव्हा राज्यपालांनी RSS चे समर्थन केले होते. म्हणून विरोधी पक्षांनी राज्यपालांच्या अभिभाषणावरही बहिष्कार घातला.
 
राज्यपाल हे सरकारच्या वतीने ‘माझे सरकार हे करणार आहे,’ असे अभिभाषणात सांगतात. परंतु यांच्या सरकारने आजवरच्या अधिवेशनात सांगितलेली एकही गोष्ट केलेली नाही, उलट असहिष्णुतेचे वातावरण पसरवले, असा आरोप या वेळी आ. जितेंद्र आव्हाड यांनी केला.
 
ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकरांना आपले मत मांडले म्हणून भर सभेत खाली बसवण्यात आले, सचिन तेंडुलकरला मत मांडले म्हणून देशद्रोही ठरवण्यात आले. हे देशात काय चालले आहे, असा प्रश्नही त्यांनी विचारला. नथुराम गोडसेच्या जन्मदिनी शौर्य दिन साजरा करण्यात आला, मात्र मुख्यमंत्र्यांनी शब्द देऊनही त्याबाबत काहीच कारवाई केली नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

सर्व पहा

नवीन

BMC Election 2026 : ठाकरे बंधूंचा जाहीरनामा ४ जानेवारी रोजी प्रसिद्ध होणार, तर भाजप ५ तारखेनंतर प्रसिद्ध करणार

कसाबला पकडणारे IPS अधिकारी सदानंद दाते महाराष्ट्राचे नवे डीजीपी, ते नवीन वर्षात पदभार स्वीकारतील

Rules Changes From 1 January 2026 आजपासून हे प्रमुख नियम बदलले, ज्यांचा थेट तुमच्या खिशावर परिणाम होऊ शकतो

२०२६ च्या मध्यापर्यंत, १० लाख भारतीय कॅनडामध्ये बेकायदेशीर ठरतील!

सारा तेंडुलकरच्या हातात बिअरची बाटली धरलेला व्हिडिओ व्हायरल, युजर्स ट्रोल करत आहेत

पुढील लेख
Show comments