rashifal-2026

दानवेंच्या वक्त्यावर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जोडे मारो आंदोलन

Webdunia
ऊसदर आंदोलक शेतकऱ्यांच्या छातीवर गोळी मारण्याऐवजी पायावर गोळी मारू शकत होते असे बेताल वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केले याच्या निषेधार्थ त्यांच्या प्रतिकृतीला शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली व शहर उपाध्यक्ष शिवराज ओबेरॉय यांच्या नेतुत्वाखाली जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
 
शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात सरकार पूर्णतः अपयशी ठरली आहे. शेवगाव तालुक्यातील घोटण व खानापूर परिसरात ऊसदर वाढीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन व रस्तारोको केले होते. शेतकऱ्यांनी केलेले आंदोलन म्हणजे सरकारचा नाकर्तेपणा. हा नाकर्तेपणा झाकण्यासाठीच शेतकऱ्यांवर हा गोळीबार करण्यात आला. गोळीबारात दोन शेतकऱ्यांना गोळी लागली असून आंदोलनकर्त्यांवर गोळीबार न करता हा प्रश्न चर्चेने सुटू शकला असता. आंदोलन रोखण्याचे अनेक पर्याय असताना गोळीबार हा पर्याय होवूच शकत नाही हे सरकार शेतकरी विरोधी असल्याचे या गोळीबार प्रकरणातून स्पष्ट झाले आहे. त्यात रावसाहेब दानवेनी शेतकऱ्यांच्या पायावर गोळी मारण्याचे केलेले वक्तव्य अतिशय अशोभनीय असून यातून हेच स्पष्ट होते कि शेतकऱ्यांना गोळीमारा. यामुळे दानवेनी शेतकऱ्यांची माफी मागावी अशी मागणी शहर उपाध्यक्ष शिवराज ओबेरॉय यांनी केली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पत्नी अजूनही तिच्या माजी प्रियकरावर प्रेम करत असेल तर काय करावे?

दररोज कमी पाणी पिण्याची सवय मुतखड्याचा धोका वाढवू शकते

वॅक्सिंग करताना या टिप्स अवलंबवा

मकर संक्रांतीला मासिक पाळी आल्यावर काय करावे

२०२६ मध्ये या ४ राशींचे भाग्य पूर्णपणे बदलेल, तुम्ही तयार आहात का?

सर्व पहा

नवीन

प्राणघातक 'मांझा' ने घेतला दोघांचा बळी; वडील आणि मुलगी ७० फूट उंच उड्डाणपुलावरून पडल्याने मृत्यू

LIVE: नांदेडमध्ये नगरपालिका निवडणुकीच्या आधी काँग्रेस उमेदवाराच्या पतीवर हल्ला

इराणसोबतच्या तणावादरम्यान, अमेरिकेचा मोठा निर्णय; ७५ देशांचे सर्व व्हिसा निलंबित

जप्त केलेल्या रुपयांच्या व्याजाचा अर्धा भाग सशस्त्र सेना कल्याण निधीत देण्याचे मुंबई उच्च न्यायालयाने ईडीला दिले आदेश

महायुती २९ पैकी इतक्या महानगरपालिकांवर नियंत्रण ठेवेल; उपमुख्यमत्री फडणवीसांचा दावा

पुढील लेख
Show comments