Dharma Sangrah

चंद्रपूरमधील कन्हाळ गाव अभयारण्य म्हणून घोषित

Webdunia
शनिवार, 5 डिसेंबर 2020 (10:18 IST)
राज्य वन्य जीव मंडळाच्या बैठकीत कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्ग आणि विदर्भातील २ ठिकाणांसह एकूण १० नवीन संवर्धन राखीव क्षेत्राला मान्यता देण्यात आली. तर चंद्रपूरमधील कन्हाळ गाव हे अभयारण्य घोषित म्हणून करण्यात आले.
 
आंबोली दोडामार्ग (सिंधुदुर्ग), चंदगड, आजरा- भुदरगड, गगनबावडा, पन्हाळगड (कोल्हापूर), जोर जांभळी व मायनी (सातारा) या पश्चिम घाटातील या ८ संवर्धन राखीव  क्षेत्रामुळे वन्यजीवांचा भ्रमण मार्ग संरक्षित झाला आहे. तर विदर्भातील महेंद्री व मुनिया या क्षेत्रास ही संवर्धन राखीवचा दर्जा देण्यात आला आहे.
 
राज्यात पूर्वी ६ आणि नवीन घोषित तिलारी अशी मिळून ७ संवर्धन राखीव आहेत. त्या क्षेत्रात महत्वाची कामे करण्यासाठी २० कोटी रुपयांचा निधी द्यावा, या वन विभागाच्या मागणीवर प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
 
महेंद्रीला संवर्धन राखीव घोषित करताना भविष्यात त्याचे अभयारण्यात रूपांतर करण्यापूर्वी लोकांना विश्वासात घेऊन, गावकऱ्यांशी चर्चा करून पुनर्वसनाचा कालबद्ध कार्यक्रम तयार करावा व वाघाप्रमाणे बिबट्या आणि मानव संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना सुचवाव्यात त्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करा, अशा सूचनाही त्यांनी केली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

सर्व पहा

नवीन

LIVE: पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी निधन

उद्धव ठाकरे यांनी अमित साटम यांचे नाव चुकीचे उच्चारल्याने वाद

पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे वयाच्या 82 व्या वर्षी निधन

नीरज चोप्रा यांनी जेएसडब्ल्यूसोबतचे १० वर्षांचे नाते तोडले, क्रीडा व्यवस्थापन कंपनी सुरू करणार

महाराष्ट्रात पुन्हा थंडीची लाट, मुंबई, पुणे आणि 'या' जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी

पुढील लेख
Show comments