Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अंधश्रद्धेचा कळस विवाहितेला उपाशी ठेवणे, मध्यरात्री दर्गा साफ करायला लावणे कासवाला आंघोळ

Webdunia
बुधवार, 10 जुलै 2019 (16:42 IST)
क्रूर, अघोरी घटना चंद्रपूर जिल्ह्यात घडली आहे. गुप्तधनासाठी दोन महिने नवविवाहितेचा क्रूरपणे छळ केल्याचं समोर आले आहे. चिमूर तालुक्यातल्या सावरी-बीडकर गावात हा संतापजनक प्रकार घडला आहे. अंधश्रद्धेने विकृत झालेल्या सुशिक्षित-मातब्बर कुटुंबाने, गुप्तधनासाठी नवविवाहितेला दररोज रात्री अडीच वाजता घरातील दर्गा धुऊन-जिवंत कासवाला मुरमुरे भरवण्यास लावले होते. जवळपास 50 दिवस उपासमार, मारझोड आणि अघोरी प्रकारामुळे भेदरलेल्खया, घाबरलेल्चया नवविवाहितेची अंनिसने कशीबशी सुटका केली. २०१८ मध्ये गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरीच्या वाघाडे कुटुंबातील सविता यांचा विवाह सावरी बीडकर गावातील समीर गुणवंत यांच्याशी झाला. लग्नानंतर छळन्याचा अघोरी प्रकार लग्नाच्या पहिल्याच रात्री सुरु झाला. लग्नानंतर पहिल्याच रात्री सविताच्या सासरच्यांनी तीला अडीच वाजता उठून, घराच्या अंगणात असलेल्या पुरातन दर्ग्याची स्वच्छता करून ते धुण्यास सांगितले. त्यासोबत तेथे असलेल्या जिवंत कासवाला आंघोळ घालून, पूजा अर्चना करत तब्बल दोन तास मुरमुरे खाऊ घालण्यास सांगितले गेले. याच वेळी समीरच्या अंगात आले आणि त्याने सविताला बेदम मारत चटके देण्यास सुरुवात केली. यात सासू-सासऱेही सहभागी होते. समीर यांच्या घराला उंच संरक्षक भिंत होती. त्यामुळे समीर यांच्या घरात सुरु असलेला अघोरी प्रकार शेजारच्यांच्याही लक्षात आला नाही. तसंच हे कृत्य करताना सविताला दिवसभर उपाशी ठेवले जायचे. त्यामुळे तीला पहिल्या दिवसांपासून काहीच खाण्यासाठी दिले गेले नाही.हा अघोरी प्रकार केल्याने पुरातन दर्ग्याच्या खाली असलेले गुप्तधन या सर्व विधींमुळे आपोआप वर येईल, अशी या आरोपी कुटुंबाची धारणा होती. त्यामुळे ते सवितावर अत्याचार करत तिचा अघोरीपणाने छळ करत होते. सविताने माहेच्या लोकांकडे संपर्क करू नये म्हणून तिच्याकडील फोनही सासू-सारऱ्यांनी काढून घेतला.या सर्व प्रकारात सवितासमोर सासरच्यांची धक्कादायक माहिती समोर आली. नवरा समीरचे ही तिसरे लग्न असल्याचे तिला समजले. सविताने या छळातून कशीबशी स्वतःची सुटका करून घेतली आणि माहेरच्यांशी संपर्क केला. त्यावर तिच्या वडिलांनी सविताला माहेरी घेऊन गेले. सवितावर केलेल्या छळाविषयी तिच्या वडिलांनी पोलीसांत तक्रार दाखल केली. मात्र यावर कोणतीही कारवाई झाली नव्ह्ती. आता समीर चौथे लग्न करणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सविताच्या कुटुंबाने त्यांना धडा शिकवण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना याविषयी माहिती दिली. त्यांनी पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल झाला.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments