Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

खेड बायपास झाला खुला, पुणे-नाशिक प्रवासाचा अर्ध्या तास झाला कमी

Webdunia
शुक्रवार, 28 एप्रिल 2023 (21:20 IST)
नाशिक : प्रतिनिधी 
पुणे-नाशिक किंवा नाशिक-पुणे या प्रवासासाठी चार ते पाच तास लागतात. मात्र, आता खेड (राजगुरुनगर) येथील बायपास खुला झाला आहे. त्यामुळे प्रवासाचा वेळ अर्ध्या तास कमी झाला आहे. 
 
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) ने खेड (राजगुरुनगर) येथील बायपास वाहतुकीसाठी खुला केला आहे. हा बायपास दोन जिल्ह्यांना (पुणे आणि अहमदनगर) जोडणाऱ्या महामार्गालगतचा आहे. एकूण ४.९ किलोमीटर लांबीला हा बायपास आहे. या बायपासमुळे पुणे-नाशिक प्रवासाचा वेळ रस्त्याने किमान ३० मिनिटांनी कमी होणे अपेक्षित आहे.
 
पुणे ते नाशिक दरम्यानचे २१२ किमीचे अंतर साधारणपणे ४.५ तासांत कापले जाते. आणि काहीवेळा हे अंतर कापण्यासाठी तब्बल ६ तासही लागतात. त्याचे मुख्य कारण आहे ते खेड शहरातून जाणारा अरुंद मालवाहतूक मार्ग. याच रस्त्यावर मोठी बाजारपेठ आहे. महामार्गालगत राज्य बस वाहतूकही आहे. यामुळे वाहतुकीची अनेकदा प्रचंड कोंडी होते. या महामार्गावरुन जाणारी अवजड वाहने आणखीनच समस्या वाढवतात. त्यामुळे या भागातून जाणाऱ्या वाहनांना अतिरिक्त ३० ते ४५ मिनिटे लागतात. अनेकदा सर्वाधिक रहदारीच्या वेळेत अवघ्या ५ किलोमीटर लांबीच्या पट्ट्यात किमान १० पोलीस कर्मचारी तैनात केले जातात. 
 
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ऑक्टोबर २०२० मध्ये खेड बायपासचे बांधकाम सुरू केले होते. दोन वर्षांत हे काम पूर्ण करण्यात आले आहे. आता या बायपास खुला झाला आहे. 
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Navratri 2024 : महाराष्ट्रातील प्रसिद्ध जागृत देवी मंदिरे

Ekadashi Shradh 2024 पितरांच्या उद्धारासाठी एकादशी श्राद्ध नक्की करावे, सद्गती मिळेल

घरात कटकटी होत आहेत? तर हे 5 प्रभावी उपाय नक्की करून पहा

कोणी मनुका खाऊ नये? या लोकांनी रिकाम्या पोटी किशमिश खाल्ल्यास समस्या वाढू शकतात

केवळ फायदेच नाही, अंडी खाल्ल्याने होऊ शकतात आरोग्याला हे 6 नुकसान

सर्व पहा

नवीन

कोरोना महामारीदरम्यान मृत्यू झालेल्या 5 कोरोना योद्ध्यांना दिल्ली सरकार प्रत्येकी 1 कोटी रुपये देणार

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले

दिल्लीहून न्यूयॉर्कला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये प्रवाशांच्या जेवणात आढळले झुरळ

मुंबई सिनेट निवडणुकामध्ये शिवसेनाने यश मिळवला, ही तर विजयाची सुरुवात -आदित्य ठाकरे

अरविंद केजरीवाल लवकरच मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार

पुढील लेख
Show comments