Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या; अतिवृष्टीने विद्यापीठाचा निर्णय

Webdunia
गुरूवार, 11 ऑगस्ट 2022 (09:14 IST)
महाराष्ट्र भर पावसाचा जेर वाढत आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर सह कोकण भागात पावसाने थैमान घातले आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी दळणवळण ठप्प झाले आहे. त्यामुळे शिवाजी विद्यापीठात सुरू असलेल्या परिक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला आहे.
 
 पश्चिम महाराष्ट्रात गेले काही दिवस पाऊसाची जोरदार बॅटिंग चालु आहे. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. याचा परिणाम शैक्षणिक क्षेत्रावर सुद्धा झाला आहे. विद्यापिठात सध्या ऑगस्ट २०२२च्या परिक्षा सुरू आहेत. शिवाजी विद्यापीठाचे परिक्षेत्र असलेल्या सांगली, सातारा, कोल्हापूर, आणि सोलापूर जिल्ह्यात पावसाचा जोर असल्याने काही भागात नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊन वाहतूक आणि दळणवळण ठप्प झाले आहे. परिक्षेसाठी येणार्या विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी विद्यापीठाने दि १० आणि ११ या दिवशीच्या परिक्षेचं वेळापत्रक स्थगित केले आहे. या दिवशी होणाऱ्या परिक्षेचे सुधारित वेळापत्रक लवकरच सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल असे विद्यापीठ प्रशासनाने जाहीर केले आहे.

संबंधित माहिती

महाराष्ट्रात मतदान करण्यापूर्वी शाहरुख खानने लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले

पुण्यात भरधाव वेगात असलेल्या आलिशान कारने दुचाकीला धडक दिली, दोघांचा मृत्यू

SRH vs PBKS : आजच्या सामन्यात हैदराबादची नजर दुसऱ्या स्थानावर असेल

Lok sabha elections 2024 : भाजपला आता आरएसएसची गरज नाही,उद्या ते आरएसएसला नकली म्हणतील- उद्धव ठाकरे

एअर इंडिया एक्स्प्रेस विमानाने उड्डाण करताच इंजिनला आग, सुदैवाने 179 प्रवाशांचे प्राण वाचले

मुंबई पोलिसांना दादर येथील मॅकडोनाल्ड बॉम्बने उडवून देण्याची धमकीचा कॉल

चाकण शिक्रापूर मार्गावर गॅस चोरी करताना गॅस टॅंकरचा भीषण स्फोट

अफगाणिस्तानात पावसाचा उद्रेक, पुरामुळे 68 जणांचा मृत्यू

बाबा रामदेव यांना पुन्हा धक्का! पतंजलीची सोनपापडी गुणवत्ता चाचणीत फेल!

जम्मू-काश्मीरमध्ये दोन ठिकाणी दहशतवादी हल्ले, शोपियां मध्ये माजी सरपंचाची हत्या

पुढील लेख
Show comments