Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विधान परिषदेच्या जूनमध्ये 15 जागांसाठी निवडणूक?

vidhan bhavan
Webdunia
गुरूवार, 8 फेब्रुवारी 2024 (08:22 IST)
स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्याने विधान परिषदेच्या सहा जागांसाठी निवडणूक होण्याची शक्यता नाही. त्यामुळे विधान परिषदेतील रिक्त जागांची संख्या 27 पर्यंत पोहचणार आहे. मात्र, विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक अशा प्रत्येकी दोन तसेच विधानसभा सदस्यांच्या मतदानाद्वारे 11 अशा एकूण १५ जागांसाठी निवडणूक होऊ शकते. ही निवडणूक येत्या जून महिन्यात अपेक्षित आहे. त्यामुळे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राजकीय पक्षात नवे डावपेच खेळले जातील.
 
येत्या मे आणि जून महिन्यात अनिकेत तटकरे (रायगड-रत्नागिरी- सिंधुदुर्ग स्थानिक प्राधिकारी संस्था), नरेंद्र दराडे (नाशिक स्थानिक प्राधिकारी संस्था), रामदास आंबटकर (वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक प्राधिकारी संस्था), विप्लव बाजोरिया (परभणी- हिंगोली- स्थानिक प्राधिकारी संस्था), सुरेश धस (धाराशिव- लातूर-बीड स्थानिक प्राधिकारी संस्था) आणि प्रवीण पोटे- पाटील (अमरावती स्थानिक प्राधिकारी संस्था) यांची विधान परिषदेची मुदत संपत आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर गेल्या दोन-अडीच वर्षांपासून महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका रखडल्या आहेत. त्यामुळे या सहा जागांची निवडणूक होण्याची शक्यता नाही. याआधीच अहमदनगर, सोलापूर, ठाणे, जळगाव, सांगली -सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा- गोंदिया या नऊ स्थानिक प्राधिकारी संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत. त्यामुळे या रिक्त जागांमध्ये आता आणखी सहा जागांची भर पडणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Breast Size स्तनांचा आकार वाढवण्यासाठी दररोज करा हे योगासन, आकर्षण वाढेल

२९ मार्च रोजी शनि कुंभ राशीत अस्त करणार, ३ राशींना अडचणींना सामोरे जावे लागेल!

Surya Grahan 2025 वर्षातील पहिले सूर्यग्रहण भारतात दिसेल का? सुतक काळ आणि त्याचा परिणाम जाणून घ्या

उन्हाळ्यात भाजी खरेदी करताना या गोष्टी ठेवा लक्षात

घराच्या दिशेनुसार कोणती झाडे लावावीत

सर्व पहा

नवीन

जर घरे पाडली तर आम्ही घरात घुसून मारहाण करू, नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना नरेंद्र पाटील यांचा इशारा

LIVE: राहुल गांधी आणि कामरा दोघांनीही संविधान वाचलेले नाही, शिंदेंवरील टिप्पणीवर मुख्यमंत्री संतापले

'जर त्यांनी भाजपचा पर्दाफाश केला तर...', सुशांत प्रकरणात संजय राऊत म्हणाले- उद्धव यांनी नारायण राणेंना फोन केला नाही

Kunal Kamra's Controversy जे अधिकारात आहे चे बोलले पाहिजे- कुणाल कामराच्या वादग्रस्त गाण्यावर अजित पवार काय म्हणाले?

रायगड किल्ल्यावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवण्याची संभाजीराजे छत्रपती यांची मागणी

पुढील लेख
Show comments